शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: थाटात घोषणा, दहा वर्षात लागली वाट! देशातील पहिल्या 'डिजिटल व्हिलेज'मध्ये इंटरनेटही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:31 IST

दिसतो केवळ फलक : वाय-फायची सेवाही झाली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील पहिले 'डिजिटल व्हिलेज' म्हणून मेळघाटातील हरिसाल या गावाची २०१५ साली मोठ्या थाटात घोषणा झाली. अवघ्या एका वर्षातच ते अस्तित्वातदेखील आले. मात्र लवकरच ते अपयशी ठरले. इंटरनेट सेवेच्या कोलदांड्यामुळे 'डिजिटल व्हिलेज'चे नुसते स्वप्नच भंगले नाही तर शासनाची ही योजना फसवी ठरल्याचा प्रत्यय मेळघाटवासीयांना आला. आज दहा वर्षानंतर 'डिजिटल व्हिलेज हरिसाल' असा फलकच तेथे दिसतो. योजना मात्र बासनात गुंडाळल्या गेल्या. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले असते तर हरिसाल हे खरंच आदर्श गाव ठरले असते. मेळघाटातून कुपोषणाला हद्दपार करून तेथील आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातून हरिसाल हे 'डिजिटल व्हिलेज' म्हणून नावारूपास आले. राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात झालेल्या करारानुसार धारणी तालुक्यातील हरिसाल गावाला इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जगाशी जोडण्यात आले.

जगाच्या नकाशावर हरिसालची ओळख झाली. परंतु स्थानिक जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे गाव आज 'एक्स डिजिटल व्हिलेज' झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामी लागली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक वाऱ्या झाल्या. गावात मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. मात्र अवघ्या काही वर्षातच ही सेवा बंद झाली. ७५० एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले होते. प्रत्यक्षात किती सुरू आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. 

काही वर्षांतच बंद झाले ई- टेलिमेडिसिन केंद्र

  • गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात ई- टेलिमेडिसिन केंद्र आले. २०१६ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या केंद्रात सुमारे ३५० रुग्णांनी लाभघेतल्याची नोंद आहे. 
  • गावात बसून रुग्णांना अमरावती 3 शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभेल, अशी योजना आखण्यात आली होती. काही दिवस त्याची अंमलबजावणीदेखील झाली. परंतु फेब्रुवारी २०१९ पासून हे केंद्र डॉक्टरांअभावी बंद झाले.

"सरकारी गावकऱ्यांना योजना आणि सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी डिजिटल कार्यालय स्थापन करण्यात आले होते. मात्र आता तेही बंद झाले आहे. एकंदरीत डिजिटल सुविधा कुठेही दिसत नाही."- सलीम भटारा, माजी उपसरपंच, हरिसाल.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र