शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बसेसमुळे वायुप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:33 IST

काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाला केव्हा येणार जाग?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.जड वाहने, ट्रक, इतर खासगी वाहनांतून वायूप्रदूषण होत आहे. परंतु १५ वर्षे सतत चाललेल्या परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त व भंगार बसेस स्क्रॅप करायला हव्या आहेत. तसा नियमदेखील आहे. मात्र, १० लाख किमी अंतर कापल्यानंतरही त्या बसेस रस्त्यावर चालविण्याचा प्रताप महामंडळ प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरातील प्रदूषण थांबविण्याकरिता कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना दुसरीकडे या भंगार बसेस राजरोस काळा धूर सोडून शहरातील वातावरण दूषित करीत आहे. याकडे प्रशासनाची नजर का जाऊ नये, असा सवाल नागरिकांचा आहे. काळा धूर आरोग्यास घातक आहे. यातून श्वसनलिकेसंदर्भातील आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. जिल्ह्यात एकूण ४५० बसेस सेवेत आहेत. त्यापैकी ५० ते ६० बसेस भंगार झाल्या आहेत. त्या बसेसच्या फेºया मध्यवर्ती आगारातून होत असल्याने काळा धूर ओकत त्यांचा प्रवास सुरू आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान परतवाडा आगाराची एमएच ०७ सी ७१४० क्रमांकाची बस गाडगेनगर चौकातून अमरावती आगारात जात असताना काळा धूर ओकत राजरोजसपणे धावत होती. सायलन्सरमधून निघणाºया काळ्या धुरामुळे वातावरण दूषित होत होते. रोज अशा अनेक बसेस धावत असताना प्रशासन कारवाई केव्हा करणार? व भंगार बसेस रस्त्यावर धावणे केव्हा थांबणार, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांचा आहे.प्रत्येक बसेसची तपासणीराज्य महामार्ग परिवहन विभागाच्या प्रत्येक बसेस पासिंगसाठी आरटीओत आणल्या जातात. अ‍ॅटोमॅटिक यंत्राव्दारे तपासणी केली जाते. पीयूसी, ब्रेक, लाईट, इंडिकेटर,इंजीनची तपासणी केली जाते तरही भंगार बसेस धूर ओकत रस्त्यावर धावतात कशा, असा सवाल नागरिकांचा आहे.श्वसनाच्या आजारात वाढवायूप्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे श्वसनाचा आजार बळावतो. प्रदूषणामुळे व्यक्तींच्या संपूर्ण शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होतो. याची लक्ष्णे स्पष्ट दिसत नसली तरी त्याचा परिणाम कित्येक वर्षे हळूहळू होत राहतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :state transportएसटीpollutionप्रदूषण