शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाकाठी शेतकऱ्यांचे वाचणार ५० कोटी

By admin | Updated: December 21, 2014 22:51 IST

राज्याच्या पणन विभागाने कृषी मालावर मालाच्या विक्री मूल्यावर घेतली जाणारी आडत कपात वसुली बंद करण्याचे आदेश शनिवारी जारी केले. खरेदीदाराकडून शेकडा एक टक्के आडत घेण्याचा

पणन विभागाचा निर्णय : शेतीमालावरील आडत बंद, शेतकऱ्यांकडून स्वागत
अमरावती : राज्याच्या पणन विभागाने कृषी मालावर मालाच्या विक्री मूल्यावर घेतली जाणारी आडत कपात वसुली बंद करण्याचे आदेश शनिवारी जारी केले. खरेदीदाराकडून शेकडा एक टक्के आडत घेण्याचा निर्णय राज्याचे पणन संचालकांनी घेतला आहे. सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भासाठी हा निर्णय दिलासादायक आहे. शेतमालावर दीड ते अडीच टक्क्यापर्यंत व भाजीपाल्यावर सात टक्यापर्यंत कटणारी आडत थांबल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आडतीसाठी कापण्यात येणारे ५० कोटी रुपये वाचणार आहेत.
आडत आकारणी शेतकऱ्यांकरुन करावी की नाही यावरुन राज्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. याबाबत राज्यशासनाने ठोस भूमिका घेत आडत कपास शेतकऱ्यांच्या पट्टीमधून न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आडत्या व व्यापाऱ्यामध्ये या निर्णयाप्रती नाराजी आहे.
शेती ही पूर्णतह: निसर्गावर अवलंबून आहे. मात्र काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपनामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. उत्पादन खर्चावर आधारित परतावादेखील मिळत नाही व शेतकरी असा एकमेव घाटक आहे की त्यानेच उत्पादित केलेल्या मालाचा भाव त्याला ठरविता येत नाही व या प्रकारात शेतकऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यातच शेतमाल आडतीवर गेल्यानंतर आडतच्या नावाखाली शेकडा दीड ते अडीच टक्के रकम त्याच्या पट्टीतून कपात होते. जिल्ह्यात अमरावती बाजार समितीसह सर्व तालुका बाजार समिती व उपबाजार आहे. यामध्ये दरवर्षी दीड हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल होते. म्हणजे आडतीपोटी किमान ५० कोटी रुपये श्ेतकऱ्यांच्या पट्टीमधून कापले जातात. शिवाय, हमाल, मापारी, वाहतूक खर्च वेगळाच आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होते. अशा परिस्थिीतीत पणन महासंघाचे संचालक सुभाष माने यांनी शनिवार २० डिसेंबरला शासकीय परिपत्रक काढले. त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, अनूज्ञाप्ती प्राप्त खासगी बाजार यामध्ये कृषी मालाच्या (भूसार/नाशवंत/बिगरनाशवंत) विक्री मुल्यावर कृषीमाल उत्पादक शेतकरी, कृषक यांच्याकडून आडत कपात/वसुली न करता सर्व प्रकारच्या विक्रीमूल्यावर खरेदी दाराकडून आडत कपात/वसूली करावी, असे आदेश काढले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा उपनिबंधकांनी, सहकारी संस्थांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीनी अनुज्ञप्तीधारक खासगी बाजार यांनी काटेकोरपणे करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)