शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पांत ३९.७७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघू अशा एकूण ९० सिंचन प्रकल्पांत ११ जुलै रोजीच्या जलसंपदा ...

अमरावती : जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघू अशा एकूण ९० सिंचन प्रकल्पांत ११ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार सरासरी ३९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

१० ते १२ दिवस पावसाने दडी मारल्याने यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा साचणार की कसे, हा प्रश्न अमरावतीकरांना लागला होता. मात्र शनिवारी पावसाने उशिरा का होईना, मात्र दमदार हजेरी लावली. बडनेरा, दर्यापूर, अंजनगाव, भातकुली यांसह अनेक तालुक्यांमध्ये जोेरदार पाऊस झाला. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.१८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिनांकापर्यंत ५७.५१ टक्के पाणीसाठा साचला होता, तर ८४ लघू प्रकल्पांत सरासरी २८.७४ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची नोंद ही ८ जुलै रोजी घेण्यात आल्याची अधिकाऱ्यांन सांगितले.

बॉक्स:

पाच मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ३७.३५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिनांकापर्यंत ३८.२० टक्के पाणीसाठा होता. आता शहानूर प्रकल्पात ३६.८८ टक्के, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा प्रकल्पात ५५.८९ टक्के, सपन ५२.४९ टक्के, पंढरी मध्यम प्रकल्पात ८.०१ टक्के पाणीसाठा साचला आहे. यंदा पिण्याच्या पाण्याची जरी टंचाई नसली तरी भविष्यात सिंचनासाठी पाणी देताना प्रकल्प शंभर टक्के भरणे अपेक्षित आहे.