शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुसऱ्या महायुद्धातील सैनिक, विधवा पत्नीच्या मानधनात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:55 PM

दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत व त्यानंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवांना सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपये दरमहा मानधनात घसघशीत वाढ करून ती सहा हजार रुपये करण्यात आली आहे.

चेतन घोगरे 

अमरावती - दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत व त्यानंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवांना सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपये दरमहा मानधनात घसघशीत वाढ करून ती सहा हजार रुपये करण्यात आली आहे.

राज्यातील दुसऱ्या महायुद्धात लढलेले माजी सैनिक, वीरगतीला प्राप्त सैनिकांच्या विधवांना सर्वप्रथम ऑक्टोबर १९८९ ला सामान्य प्रशासन विभागाकडून ३०० रुपये निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले होते. १ मे २०११ पासून दरमहा तीन हजार रुपये देण्यास सुरुवात करण्याचा सामान्य प्रशासनाने निर्णय घेतला. ही रक्कम सध्याच्या घडीला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तोकडी पडत असल्याचे लक्षात घेऊन १ एप्रिल २०१८ पासून दरमहा सहा हजार इतके अर्थसाहाय्य करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेले माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना दरमहा सहा हजारांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. त्यासाठी येणारा खर्च क्रमांक ए-५ लेखाशिर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६० - इतर सामाजिक व कल्याण कार्यक्रम १०२, सामाजिक सुरक्षा योजनेखाली निवृत्तीवेतन, राज्यात आदिवासी असलेल्या, दुसऱ्या जागतिक महायुद्धातील सैनिक व त्यांच्या निवृत्तीवेतन लेखाशीर्षाखाली मंजुरी अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

वेळोवेळी खातरजमा करण्याचे आदेश 

दुसऱ्या महायुद्धात योगदान देणारे माजी सैनिक, विधवा पत्नींना अर्थसहाय्य वितरण करताना लाभार्थी जिवंत आहे किंवा नाही, याची जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सैनिक कल्याण विभाग (पुणे) येथील संचालकांच्या मदतीने पडताळणी तसेच त्याबाबतची खातरजमा करावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद आहे.

अमरावती जिल्ह्यात १४२ वीरपत्नी

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट (नि.) रत्नाकर चरडे यांच्याशी संपर्क केला असता, जिल्ह्यात दुसऱ्या महायुद्धात लढलेले तीन माजी सैनिक व १४२ वीरपत्नी हयात असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून दरमहा सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :warयुद्धAmravatiअमरावती