शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठीचा २५ वर्षांचा लढा संपला; विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:58 IST

जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

वाढोणा रामनाथ (अमरावती) : १९९३ साली दोन एकर शेत शासनाने पाझर तलावासाठी संपादित केले. त्याचे अवघे १३ हजार रुपये हाती ठेवले. तेव्हापासून वाढीव मोबदल्यासाठी प्रशासनाविरुद्ध सुरू केलेला लढा मृत्यूने संपला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील अनिल महादेव चौधरी यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

अनिल चौधरी (४५) यांच्याकडे १४ एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर शेत गावतलावाकरिता प्रशासनाने १९९३ मध्ये ताब्यात घेतले. त्यावेळी जेमतेम १३ हजार रुपये त्यांच्या हातावर ठेवण्यात आले. १९९५ मध्ये अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाढीव मोबदल्यासाठी अर्ज केला. २५ वर्षांत अनेकदा चकरा घालूनही त्यांच्या अर्जावर विचार झाला नव्हता. दरम्यान, त्यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. 

अलीकडे अनिल चौधरी यांच्या शेतालगत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अनिल चौधरी यांच्या विरोधाला न जुमानता या कामावरील ठेकेदाराने त्यांच्या शेतात मुरूम काढण्याकरिता जेसीबीने मोठा खड्डा केला. यानंतरही या शेतातून उत्खनन सुरूच होते. ते बंद करण्यात यावे, ही मागणी घेऊन त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले ते हाती कीटकनाशकाची बॉटल घेऊनच. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे विमनस्क स्थितीत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याच दालनासमोर विष प्राशन केले व अंगावर पेट्रोल ओतले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

पत्नीचीही प्रकृती खालावलीअनिल चौधरी यांच्या मनमिळावू व्यक्तिमत्त्वामुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यूबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली. पत्नी भारती यांचा शोक अनावर झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अनिल चौधरी यांच्या पश्चात आठ वर्षाचा मुलगा, १४ व सात वर्षाच्या मुली आणि दोन बहिणी आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग