शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 7:37 PM

२,७८४ कुटुंबे बाधित

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १९ व्यक्ती नैसर्गिक आपत्तीच्या बळी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त लहान-मोठी ५१ जनावरे दगावली. या आपत्तीमुळे २,७८४ कुटुंबे बाधित झाली, तर किमान १ लाख ९८ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४२ हजार ८५० हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांनी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी पार केली. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मोठी  वित्तहानी व प्राणहानी झाली. या चार महिन्यांतील आपत्तीमध्ये जिल्ह्यात ५३० गावांमध्ये २,७८४ कुटुंबे बाधित झाली आहेत. १९ जण दगावले. यापैकी ११ जण पुरात वाहून गेले, तर आठ जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सर्वच प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने २३ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यापैकी १४ प्रकरणांत ४.२५ लाखांची मदत देण्यात आली. १७ लहान दुधाळ जनावरे मरण पावली. यापैकी चार प्रकरणांत ६४ हजारांची मदत देण्यात आली. याव्यितिरिक्त ओढकाम करणारी सात जनावरे दगावल्याचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये २६ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यासाठी १ लाख २७ हजार ६५० रुपयांची शासन मदत देण्यात आली. ९६ घरांची अंशत: पडझड झाली. १९०७ कच्च्या घरांची पडझड झाली. यासाठी १० लाख ७५ हजार ३९४ रुपयांची शासन मदत देण्यात आली. ५७७ घरे पूर्णत: नष्ट झाली. यासाठी २ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे.  शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान

आपत्तीमध्ये अमरावती तालुक्यात ३१,९४३ हेक्टर, भातकुली तालुक्यात १६१.२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १०५८ हेक्टर, धामणगाव रेल्वे २८,०३४ हेक्टर, चांदूर रेल्वे २०,६७९ हेक्टर, मोर्शी १९,२७७ हेक्टर, वरूड २९,९७० हेक्टर, अचलपूर ११,०६० हेक्टर, चांदूर बाजार १६१८५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १९,३२३ हेक्टर, धारणी ११,७२९ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ९३८८ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तिवसा व दर्यापूर तालुक्यात नुकसान निरंक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती