यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:50 PM2018-11-24T17:50:57+5:302018-11-24T17:51:04+5:30

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे.

This year, there is no water for irrigation | यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

Next


अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे; पण अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दोन धरणातील पाणी आतापासूनच सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.
वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत दोन महिन्यांत १४ ते १५ टक्के घट झाली असून, आजमितीस ५१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात आजमितीस ३७.५८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठाच नसून, इतर धरणात अल्प जलसाठा शिल्लक असल्याने या धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडणार नसल्याचे वृत्त आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी ५१.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ७७.५७ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९४.०४, उमा ९२.९८ टक्के तर मोर्णा धरणात ४९.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९१.३८ टक्के जलसाठा आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात ११.६६ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये २८.७६ टक्के, मन धरणात २२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८२.६९ टक्के, एकबुर्जी ७३.६० तर सोनल धरणात ९५.९८ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९४.२९, अरुणावती ७०.६७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ४३.६६ टक्के आहे.

 

ज्या धरणात मुबलक जलसाठा आहे, त्या धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान धरणात पाणी आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

Web Title: This year, there is no water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.