शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवारफेरीचा शेतकऱ्यांना किती फायदा? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:15 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त शेतकºयांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त शेतकºयांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याने, कृषी विद्यापीठाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले. २० ते २२ आॅक्टोबरपर्यंत तीन दिवस शेतकºयांना विविध संशोधन, तंत्रज्ञान बघण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती; पण हे तंत्रज्ञान, संशोधन बघून शेतकºयांना किती फायदा होतो, या अनुषंगाने विचार करणे गरजेचे आहे.बडे उद्योग अद्याप पोहोचले नसल्याने विदर्भातील अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या क्षेत्रात वेगाने होणारे बदल, नवे तंत्रज्ञान, संशोधनाची भर पडत आहे. तसेच हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, शेतकºयांना देशासह जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी हे सर्व ज्ञान येथील शेतकºयांना अवगत होणे गरजेचे आहे. याचाच सारासार विचार करू न राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. विदर्भातील अकोला येथेही विद्यापीठ स्थापन करण्यात आले; पण या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी विदर्भातील शेतकºयांना प्राणांची आहुती द्यावी लागली. या विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर २०१८ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. स्थापनेनंतर या कृषी विद्यापीठाने नवे वाण, संशोेधन, तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान, संशोधन शेतकºयांनी अवगत करू न शेतावर अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील शेतकºयांसाठी शेत शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी तीन दिवसात १० हजारावर शेतकºयांनी कृषी विद्यापीठाला भेट देऊन माहिती घेतली, प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर पाहणी केली; पण या तंत्रज्ञानाचा अवलंब किती शेतकरी करतात, हे बघणे महत्त्वाचे आहे. शिवारफेरीनंतर याचा आढावा विद्यापीठाकडून घेतला जातो का, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवारफेरीला येणारे शेतकरी नाव नोंदणी करीत असल्याने ही माहिती कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असतेच. याकडे विद्यापीठाला लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी शेतकºयांनी सेंद्रीय शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठीची रुची दाखविली. भेटी देण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली. हे चांगले संकेत असले तरी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांनी अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठालाच शेतकºयांकडे जावे लागणार आहे. शेतकºयांनी गौण तृणधान्य, भरड धान्यामध्ये नाचणी, भादली, राळा, भगर इत्यादी देशी पारंपरिक पिकांबद्दल माहिती जाणून घेतली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती, गांडूळ खत प्रकल्प, विविध जिवाणू खते, मुख्यत्वे कचºयापासून उपयुक्त कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरात आणणे, कचरा कुजविणारे जिवाणू वापराचे प्रात्यक्षिक शेतकºयांनी जाणून घेतले. याचा प्रसार आता कृषी विद्यापीठाला करावा लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडे विस्तार विभाग आहे. कृषी विभागानेदेखील सेंद्रीय शेती विकासासाठी विस्तार कक्षा रुंदावण्याची गरज आहे; पण मनुष्यबळाअभावी हे या संस्थांना शक्य नसल्याने शिवारफेरीचा फायदा शेतकºयांना होतो का, हा प्रश्न निर्माण होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठFarmerशेतकरी