शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिवारफेरीचा शेतकऱ्यांना किती फायदा? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:15 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त शेतकºयांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त शेतकºयांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याने, कृषी विद्यापीठाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले. २० ते २२ आॅक्टोबरपर्यंत तीन दिवस शेतकºयांना विविध संशोधन, तंत्रज्ञान बघण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती; पण हे तंत्रज्ञान, संशोधन बघून शेतकºयांना किती फायदा होतो, या अनुषंगाने विचार करणे गरजेचे आहे.बडे उद्योग अद्याप पोहोचले नसल्याने विदर्भातील अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या क्षेत्रात वेगाने होणारे बदल, नवे तंत्रज्ञान, संशोधनाची भर पडत आहे. तसेच हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, शेतकºयांना देशासह जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी हे सर्व ज्ञान येथील शेतकºयांना अवगत होणे गरजेचे आहे. याचाच सारासार विचार करू न राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. विदर्भातील अकोला येथेही विद्यापीठ स्थापन करण्यात आले; पण या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी विदर्भातील शेतकºयांना प्राणांची आहुती द्यावी लागली. या विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर २०१८ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. स्थापनेनंतर या कृषी विद्यापीठाने नवे वाण, संशोेधन, तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान, संशोधन शेतकºयांनी अवगत करू न शेतावर अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील शेतकºयांसाठी शेत शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी तीन दिवसात १० हजारावर शेतकºयांनी कृषी विद्यापीठाला भेट देऊन माहिती घेतली, प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर पाहणी केली; पण या तंत्रज्ञानाचा अवलंब किती शेतकरी करतात, हे बघणे महत्त्वाचे आहे. शिवारफेरीनंतर याचा आढावा विद्यापीठाकडून घेतला जातो का, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवारफेरीला येणारे शेतकरी नाव नोंदणी करीत असल्याने ही माहिती कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असतेच. याकडे विद्यापीठाला लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी शेतकºयांनी सेंद्रीय शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठीची रुची दाखविली. भेटी देण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली. हे चांगले संकेत असले तरी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांनी अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठालाच शेतकºयांकडे जावे लागणार आहे. शेतकºयांनी गौण तृणधान्य, भरड धान्यामध्ये नाचणी, भादली, राळा, भगर इत्यादी देशी पारंपरिक पिकांबद्दल माहिती जाणून घेतली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती, गांडूळ खत प्रकल्प, विविध जिवाणू खते, मुख्यत्वे कचºयापासून उपयुक्त कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरात आणणे, कचरा कुजविणारे जिवाणू वापराचे प्रात्यक्षिक शेतकºयांनी जाणून घेतले. याचा प्रसार आता कृषी विद्यापीठाला करावा लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडे विस्तार विभाग आहे. कृषी विभागानेदेखील सेंद्रीय शेती विकासासाठी विस्तार कक्षा रुंदावण्याची गरज आहे; पण मनुष्यबळाअभावी हे या संस्थांना शक्य नसल्याने शिवारफेरीचा फायदा शेतकºयांना होतो का, हा प्रश्न निर्माण होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठFarmerशेतकरी