शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

७३५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचे होणार पुनरुज्जीवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST

संतोष येलकर अकोला : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि पाणीपुरवठा योजना नसलेल्या ७० ...

संतोष येलकर

अकोला : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि पाणीपुरवठा योजना नसलेल्या ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनामार्फत १८ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिदिवस दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होत नसलेल्या ७३५ गावांत प्रतिदिवस दरडोई ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच पाणीपुरवठा योजना नसलेल्या जिल्ह्यातील ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यास शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली. यासंदर्भात शासनामार्फत १८ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येणार आहेत.

नळ जोडण्यांच्या कामांसाठी

७७.८९ कोटी रुपये मंजूर!

जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये १ लाख २० हजार २१८ नळ जोडण्या देण्याच्या कामांसाठी ७७ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये नळ जोडणी नसलेल्या कुटुंबांना नळ जोडणी देण्याची कामे करण्यात येणार आहेत.

योजनांच्या कामांची सादर

करावी लागणार अंदाजपत्रके!

जल जीवन मिशनअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन व नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करावी लागणार आहेत.