शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वऱ्हाडातील आठ प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 6:24 PM

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. फळ झाडे, पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू मिळून ५०२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत २ मे रोजी केवळ १५.५१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पाच जिल्ह्यात ९ मोठे प्रकल्प असून, २४ मध्यम तर ४६९ लघू प्रकल्प आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. या जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा प्रकल्पात केवळ ८.८३ टक्केच साठा शिल्लक आहे. मस व कोराडी मध्यम प्रकल्प शून्य टक्के, तोरणा प्रकल्पात ०.२५ टक्के, ज्ञानगंगा ८.३४, पलढग ११.१९, मन १६.४८ तर उतावळी प्रकल्पात २१.३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १५.५८ टक्के आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने या साठ्यात वेगाने घट होत आहे. निर्गुणा मध्यम प्रकल्प व घुंगशी बॅरेजमध्ये शून्य टक्के साठा असून, उमा ४.२०, मोर्णा प्रकल्पात ११.६३ तर वान प्रकल्पात ३६.३९ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात शून्य टक्के, अडाण १४.०१ तर एकबुर्जी प्रकल्पात १४.७० टक्केच साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोठ्या प्रकल्पात यावर्षी आजमितीस १७.८१ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस मोठ्या प्रकल्पात २७.५०, अरुणावती १४.२२ तर बेंबळा प्रकल्पात २२.७३ टक्के जलसाठा आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणwater scarcityपाणी टंचाई