शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.

अकोला : चालू वर्षातील पावसाळा पुरेसा आणि जमिनीत पाणी मुरवणारा झाल्याने दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या अद्याप निर्माण झाली नाही. त्याचवेळी टंचाईसाठी प्रमाण मानले जाणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा विहिरींचा पाणी पातळी अहवालही नोव्हेंबरऐवजी जानेवारीमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखडाही त्यानंतरच तयार केला जाणार असल्याची माहिती आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या अहवालावरून जिल्ह्यात आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या पुढे येऊ शकते. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते. यावर्षी परतीचा पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीवरही परिणाम झाला. येत्या काही दिवसांत पिकांसाठी पाण्याचा उपसा वाढणार आहे. त्यानंतर भूजलाची पातळी निश्चित करण्यास अनुकूल काळ निर्माण होईल. त्यामुळे चालू वर्षात नोव्हेंबरऐवजी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच भूजल पातळी नोंदविण्याची तयारी भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे. त्या अहवालानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडाही निश्चित होणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.पाणी जिरण्यालाही लागतो वेळ!महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षीची तालुकानिहाय घटतेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली होती. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूरमध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट होती. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट झाली होती. चालू वर्षी हा अहवाल जानेवारीनंतर तयार होणार आहे.

 

 

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई