शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.

अकोला : चालू वर्षातील पावसाळा पुरेसा आणि जमिनीत पाणी मुरवणारा झाल्याने दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या अद्याप निर्माण झाली नाही. त्याचवेळी टंचाईसाठी प्रमाण मानले जाणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा विहिरींचा पाणी पातळी अहवालही नोव्हेंबरऐवजी जानेवारीमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखडाही त्यानंतरच तयार केला जाणार असल्याची माहिती आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या अहवालावरून जिल्ह्यात आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या पुढे येऊ शकते. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते. यावर्षी परतीचा पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीवरही परिणाम झाला. येत्या काही दिवसांत पिकांसाठी पाण्याचा उपसा वाढणार आहे. त्यानंतर भूजलाची पातळी निश्चित करण्यास अनुकूल काळ निर्माण होईल. त्यामुळे चालू वर्षात नोव्हेंबरऐवजी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच भूजल पातळी नोंदविण्याची तयारी भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे. त्या अहवालानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडाही निश्चित होणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.पाणी जिरण्यालाही लागतो वेळ!महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षीची तालुकानिहाय घटतेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली होती. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूरमध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट होती. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट झाली होती. चालू वर्षी हा अहवाल जानेवारीनंतर तयार होणार आहे.

 

 

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई