अतिक्रमण र्निमुलन पथकावर भाजीविक्रेत्यांचा हल्ला
By Admin | Updated: June 20, 2014 21:43 IST2014-06-20T21:24:52+5:302014-06-20T21:43:56+5:30
अकोला महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी शुक्रवारी हल्ला चढवला.

अतिक्रमण र्निमुलन पथकावर भाजीविक्रेत्यांचा हल्ला
अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील भाजी विके्रत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजी विके्रत्यांनी हल्ला चढवला. वाहनांवर केलेल्या दगडफेकीत मनपाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता असलेल्या जठारपेठ चौकात भर रस्त्यावर भाजी विके्रत्यांनी बाजार मांडला. स्थानिक रहिवाशांनी हटकल्यास त्यांना शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. त्यानुषंगाने मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भाजी विके्रत्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु हा प्रस्ताव धुडकावून लावत भाजी विके्रत्यांनी याच ठिकाणी व्यवसाय करण्याला पसंती दिली. यावर आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी स्वत: गुरुवारी या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर भाजी विके्रत्यांनी प्रचंड दगडफेक करीत हल्ला चढवला. यामध्ये टिप्पर चालक अशोक मुरदुंगे, सूर्यकांत बन्सोड व जेसीबी चालक मधुकर कांबळे जखमी झाले. यावेळी जमावाने वाहनांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच, आयुक्तांसह कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला असता भाजी विके्रत्यांनी पळ काढला. पोलिस संरक्षणात पुन्हा या भागातील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यात आले.