शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 16:41 IST

महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते.

Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीतप्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील सहभागी होण्यासाठी अनुकूल आहे. मात्र जागावाटपाचा पेच कायम असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीतील घटकपक्ष नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"मी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र माझ्याव्यतिरिक्त वंचितकडून अन्य कोणत्याही उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही," असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. वंचित आघाडीने अकोल्यासह वर्धा आणि सांगलीसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

"वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कमिटीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मला पत्र लिहीत एका उमेदवाराचं नाव सुचवलं आणि या जागेसाठी आपण महाविकास आघाडीत आग्रह धरावा, अशी विनंती जिल्हा कमिटीने केली आहे. मात्र जिल्हा कमिटीला उमेदवार ठरवण्याचे किंवा जाहीर करण्याचे अधिकार नाहीत. त्यांनी फक्त नाव सुचवलं आहे," अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसंच सांगलीबाबत आम्ही आमची भूमिका ८ मार्च रोजी जाहीर करू, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "महाविकास आघाडी व्हावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. मात्र महाविकास आघाडी न झाल्यास राज्यात भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आघाडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचे कार्यकर्त्यांना आदेश

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचं आवाहन केलं आहे. "वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. मी किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये," अशा सूचना आंबेडकर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी