शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उमा प्रकल्प ओव्हरफ्लो, पिंपळशेडा व शिवण प्रकल्प निम्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 20:25 IST

Murtijapur News : पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्यातील ५७ खेड्यांचासाठी संजीवनी असलेला व महत्वाचा असलेला उमा प्रकल्प शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला असला तरी पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.       तालुक्यातील महत्वपूर्ण व पिण्याच्या पाण्याठी वापण्यात येत असलेला उमा प्रकल्पावर लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. याच बरोबर दोन लघु प्रकल्पांमध्ये पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के भरलेले आहे. उमा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ५७ खेडी योजनेतील गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दुर झाली आहे. परंतु पिंपळशेडा व शिवण या लघु प्रकल्पांवर शेत सिंचनाचे मोठे क्षेत्र अवलंबून आहे. ११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लंघापुर ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत ५७ खेड्यांसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर २२४१ हेक्टर शेती सिंचनासाठी ६ ते ७ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव आहे. सद्यस्थितीत या जलाशयाने ३४४.०० असलेली पातळी ओलांडून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन ७६.६४ विसर्ग होत आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडूनही  पिंळशेडा व शिवण प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा असल्याने भविष्यात शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जसाठ्यातुन  बाष्पीभवन वगळून केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे अशक्यप्राय असल्याची स्थिती आहे.        २०१९ मध्ये उमा व पिंपळशेंडा प्रकल्प २१ अॉगष्ट पर्यंत १०० टक्के भरुन ओसंडून वाहत होते. मात्र यावर्षी २७ सप्टेंबर पर्यंत या प्रकल्पात निम्म्याच्यावरच जलसाठा उपलब्ध झाला आहे. उमा प्रकल्पामध्ये आजचा १०० टक्के, पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. शिवण आणि पिंपळशेंडा लघु प्रकल्पातून पाण्याचा केवळ शेती सिंचनासाठी उपयोग होतो परंतु अंत्यत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने परीसराती रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने पिक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्यापही ही जलाशये तुडूंब भरली नसल्याने भविष्यात तालुक्यातील बागायती शेती व रब्बी हंगामात यापाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात येणार आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरDamधरण