शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

 पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे.

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता असल्याने पाणी जरी साठले तरी हे पाणी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष मिळणार नाही, अशी अवस्था आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याची तयारी आहे; परंतु वक्रद्वार कार्यान्वित करण्यासाठी येथे विजेचा पुरवठाच झाला नसल्याचे चित्र आहे.पूर्णा बॅरेज-२ खारपाणपट्ट्यातील बॅरेज असून, हे बॅरेज बांधून झाल्यास नेरधामणा व या भागातील गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तद्वतच अकोलेकरांसाठीही बॅरेजमध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण राहील; परंतु अद्याप या बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. येत्या सप्टेंबरपर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचा बेत आहे. तो पूर्ण होतो की नाही, हे वेळच सांगेल. त्यासाठी येथे वीजच नाही. वक्रद्वार जरी लावले तरी शेतकºयांना सिंचनासाठी सध्यातरी पाणी मिळणे कठीणच आहे. शेतापर्यंत पाणी नेण्यासाठीची भूमिगत जलवाहिनीचा नकाशाच तयार नाही. या कामाला ११६ कोटीवर खर्च आहे. आता जरी सर्व प्रक्रियेला सुरुवात केली तरी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मध्येच नवीन तरंग पद्धत अवलंबविण्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असेल तथापि, हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूमिगत नलिकेचा प्रयोग करणे किंवा सरळ पाटचाºया, कॅनॉलच टाकावे लागणार आहे.कवठा बॅरेजच्या कामातही अडथळा आला आहे. या भागातील लोहारा पुलाचे काम थंड बस्त्यात असल्याने या बॅरेजचे पाणी शेतकºयांना केव्हा उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम पूर्ण झालेच नाही, उमा बॅरेजचे काम ठप्प आहे. काटीपाटी प्रकल्पाला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प