शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे.

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता असल्याने पाणी जरी साठले तरी हे पाणी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष मिळणार नाही, अशी अवस्था आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याची तयारी आहे; परंतु वक्रद्वार कार्यान्वित करण्यासाठी येथे विजेचा पुरवठाच झाला नसल्याचे चित्र आहे.पूर्णा बॅरेज-२ खारपाणपट्ट्यातील बॅरेज असून, हे बॅरेज बांधून झाल्यास नेरधामणा व या भागातील गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तद्वतच अकोलेकरांसाठीही बॅरेजमध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण राहील; परंतु अद्याप या बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. येत्या सप्टेंबरपर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचा बेत आहे. तो पूर्ण होतो की नाही, हे वेळच सांगेल. त्यासाठी येथे वीजच नाही. वक्रद्वार जरी लावले तरी शेतकºयांना सिंचनासाठी सध्यातरी पाणी मिळणे कठीणच आहे. शेतापर्यंत पाणी नेण्यासाठीची भूमिगत जलवाहिनीचा नकाशाच तयार नाही. या कामाला ११६ कोटीवर खर्च आहे. आता जरी सर्व प्रक्रियेला सुरुवात केली तरी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मध्येच नवीन तरंग पद्धत अवलंबविण्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असेल तथापि, हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूमिगत नलिकेचा प्रयोग करणे किंवा सरळ पाटचाºया, कॅनॉलच टाकावे लागणार आहे.कवठा बॅरेजच्या कामातही अडथळा आला आहे. या भागातील लोहारा पुलाचे काम थंड बस्त्यात असल्याने या बॅरेजचे पाणी शेतकºयांना केव्हा उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम पूर्ण झालेच नाही, उमा बॅरेजचे काम ठप्प आहे. काटीपाटी प्रकल्पाला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प