शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बदलांचा स्वीकार करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:23 IST

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदरसिंग घुरा यांच्याशी बातचीत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जग झपाट्याने बदलत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून, सर्वच व्यवसायांमध्ये स्थित्यंतर होत आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही या क्षेत्रात होणारे बदल अंगीकारले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदसिंग घुरा यांनी दिला आहे. ट्रान्सपोर्ट व मोटर्स व्यावसायिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अकोल्यात आलेल्या ७५ वर्षीय मोहिंदरसिंग घुरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रान्सपोर्ट व्यवसायातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. या व्यवसायातील बदलत्या स्वरूपाबाबत बोलताना ते म्हणाले, की इतर सर्वच व्यवसायांप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायातही बदल घडत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहन मालकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अंगीकार केला पाहिजे. तसेच या व्यवसायाशी निगडित नियम व कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांची अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असेही घुरा म्हणाले.राज्य व देशाच्या विकासासाठी ट्रान्सपोर्ट महासंघाकडून सत्तेत असलेल्या सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. महासंघाचे ४ प्रमुख नियम असून, यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारला सहकार्य करणे हा आहे, असे घुरा यांनी बोलताना सांगितले. देशात वाहनचालकांची कमतरताभारतात वाहनचालकांची कमतरता असल्याचा दावा यावेळी घुरा यांनी केला. देशात वाहनचालकांची संख्या कमी असल्यामुळे ८० टक्के वाहनमालकांना स्वत:च त्यांची वाहने चालवावी लागत आहेत. जड वाहनांवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्यांनाही प्रशिक्षणार्थी परवाना जारी केला पाहिजे, जेणेकरून नवीन चालक तयार होतील, असे घुरा म्हणाले.आधार कार्डवर मिळावा जामीनअपघातप्रकरणी कारवाई झाल्यास वाहनचालकाला जामीन मिळविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात आधार कार्डला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे चालकांना आधार कार्ड दाखवून जामीन मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा घुरा यांनी व्यक्त केली.चालकांची अपूर्ण झोप अपघाताचे मुख्य कारणमहामार्गांवर अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण काय असावे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल घुरा यांनी अपूर्ण झोप हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. वाहनचालकांना ठरावीक मुदतीत दिलेल्या स्थळी पोहचावे लागते. यासाठी दिवस-रात्र एक करतात. रात्री पूर्ण झोप झाली नाही, तर वाहनचालकाला झोप येणे साहजिक आहे. त्यामुळेच महामार्गांवरील अपघात वाढत आहेत, असे घुरा म्हणाले.