शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती प्रकरणात तेल्हारा तहसीलदारांनी ठोठावला ४२ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, ...

तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, तर ८ वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा असून, ८ प्रकरणांत दंडात्मक कारवाई सुरू आहे. दोन वाहने पसार झाल्याने त्याबाबत पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट कारवाया करण्यात आल्या असून, तिपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.

रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहनधारक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. महसूल विभाग कारवाई करून गौण खनिज चोरीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुक्यात बरेच नदी-नाले असून, पूर्णा व वाण नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असून, अनेक रेतीमाफिया निनावी नंबरच्या वाहनाने अवैध वाहतूक करतात. सदर वाहनेही महसूल विभागाच्या कारवाईनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठवणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपर्यंत अशा कारवाया करण्यात आल्या नाहीत, तसेच दंड वसूल होणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळेसुद्धा महसूल विभागाच्या वसुलीमध्ये बरीच घट झाली होती. मागील वर्षात २०१९-२० मध्ये केवळ अकरा वाहनांवर कारवाई करून केवळ १५ लाख महसूल शासनाकडे जमा झाला, तर चालू वर्षात सण २०२०-२०२१ च्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया करण्यात आल्या असून, ४२ लाखांवर दंड ठोठाविण्यात आला असून, २८ लाख रुपयांचा महसूल शासन दप्तरी जमा झाला आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार राजेश गुरव यांच्याकडे संजय गांधी निराधार योजना हा विभाग असताना त्यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभार आला. चालू वर्षातील मागील तीन महिन्यांत अवैध रेती वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांनी २८ प्रकरणांत कारवाई करून २६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सोबत निनावी नंबरची वाहनांकडून दंडात्मक वसुली करून ती वाहने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांच्याकडे वर्ग केली आहेत, तसेच ११२ ब्रास रेती जप्त करून तिचा जाहीर लिलाव ठेवला आहे. ज्या ठिकाणावरून रेती जप्त केली त्यांच्या सातबारावरसुद्धा दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे, असे तहसीलदार राजेश गुरव यांनी सांगितले. सदर कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.