शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:18 IST

अकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे.

- प्रवीण खेतेअकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे. २०२० पर्यंत हा आजार जगातील दुसरा सर्वांत मोठा आजार ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज या अहवालातून समोर आला आहे. गत दशकात या आजारात १८ टक्क्यांनी वाढ झाली असून, यामध्ये २५ टक्के किशोरवयीन भारतीयांचा समावेश आहे.शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये स्पर्धा अन् शैक्षणिक चढाओढ सुरू झाली आहे. शिक्षणाचा टप्पा गाठत असतानाच किशोरवयीन मुला-मुलींना रोजगाराची चिंता सतावत असते. त्यात प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात; परंतु प्रयत्न केल्यावरही काही बिघडले की मन अस्वस्थ होते. ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न होणे एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर नैराश्य येते. हे नैराश्य म्हणजेच ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ होय. २०२० पर्यंत ही स्थिती आणखी गंभीर होणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेतर्फे व्यक्त केली आहे.तरुणी व महिलांमध्ये आजाराची वृद्धी‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ हा आजार मागील काही वर्षांत तरुणी आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे विशेष. या प्रकरणीदेखील जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.आजाराची लक्षणे काय?

  1. झोप व्यवस्थित न लागणे
  2. रात्र-रात्रभर बेचैन असणे
  3. भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाणे
  4. सातत्याने बेचैन वाटणे, हाता-पायांना सतत घाम येणे
  5. आत्मविश्वास कमी होत जाणे
  6. थकवा व सुस्ती जाणवत राहणे
  7. एकाग्रता कमी होणे

‘एन्ग्झायटी डिप्रेशन’चा असा करा बचाव!

  • प्रथमत: मनमोकळे बोला
  • नियमित व्यायाम करा
  • तुमच्यातील सुप्त कलेला वाव द्या
  • नकारात्मकतेपासून दूर राहा
  • आपल्या कामाची, परिस्थितीची समीक्षा करा
  • नुसताच विचार करीत रात्र-रात्र जागू नका
  • निसर्गोपचाराचाही विचार करा
  • विशेष म्हणजे चुकांवर रडत बसू नका 

वय वर्ष १२ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये स्पर्धेचा ताण जास्त वाढला आहे. निसर्गाच्या विरुद्ध जगण्याची जीवनशैली घातक ठरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ असून, त्यामुळे शारीरिक व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ.

 

टॅग्स :Healthआरोग्यAkolaअकोला