विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:06 IST2017-11-14T20:03:28+5:302017-11-14T23:06:08+5:30
पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासर्याची १३ नोव्हेंबर रोजी सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासर्याची १३ नोव्हेंबर रोजी सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
पातूर तालुक्यातील माळराजुरा येथील सासर्याने ११ नोव्हेंबर रोजी रात्री घरात त्याच्या २२ वर्षीय सुनेचा विनयभंग केला, त्यावेळी तिने प्रतिकार करून सदर घटना सासूला सांगितली. त्यामुळे चिडलेल्या सासर्याने तिला कुर्हाडीने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी पीडित सुनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून १२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा पातूर पोलिसांनी सासर्याविरुद्ध भादंविच्या ३५४, ३२४, ५0४ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून लगेच अटक केली होती. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुटका झाल्यानंतर सासर्याने माळराजुरा शेतशिवार सर्व्हे नं. ६८ मधील बजरंगबलीच्या मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली. मृतकाकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व सून असा आप्त परिवार आहे. या घटनेप्रकरणी फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.