शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:16 IST

येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावातही अकोला पूर्व या मतदारसंघात भाजपाचा अवघ्या २ हजार ४४० मतांनी विजय झाला होता. या निसटत्या विजयानंतर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली व भाजपाचा जनाधार मजबूत केल्याचे चित्र त्यानंतरच्या कालावधीत समोर आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीची बदलती समीकरणे लक्षात घेता या पक्षामध्ये दावेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी निवडणूक रंगतदार ठरेल.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे हरिदास भदे यांनी या मतदारसंघात मिळविलेला विजय २०१४ मध्ये कायम ठेवता आला नाही. भाजपाचे रणधीर सावरकर यांनी भदे यांच्यावर विजय मिळवित भगवा फडकविला. या विजयानंतर आ. सावरकर यांनी मतदारसंघात भाजपा मजबूत केल्यामुळेच अकोला शहराच्या हद्दवाढीमध्ये सहभागी झालेल्या प्रभागांमध्ये महापािलकेच्या निवडणुकीत कमळ फुलले. या यशाचे श्रेय साहजिकच आ. सावरकर यांना जात असल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे साहजिकच पक्षातूनही त्यांच्या उमेदवारीला स्पर्धक निर्माण झालेला नाही. भाजपाने निर्माण केलेले हेच आव्हान मोडून काढण्यासाठी सर्वच विरोधकांना मोठी कसरत करावी लागेल असेच चित्र सध्या आहे.शिवसेनेलाही हवा मतदारसंघबोरगाव मंजू हा मतदारसंघ असल्यापासून या मतदारसंघातून युतीमध्ये शिवसेनेनेच लढत दिली आहे. २०१४ मध्ये सेना-भाजपा स्वतंत्र लढल्यावर या मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला, त्यामुळे आता शिवसेनेचा या मतदारसंघावरील दावा संपला असल्याचे मानले जात आहे; मात्र राजकारणात काहीही होऊ शकते या विधानावर विश्वास असल्याने युतीमध्ये शिवसेना पाचपैकी दोन मतदारसंघावर दावा कायम ठेवून आहे. त्यामध्ये अकोला पूर्वचाही पर्याय खुला आहे. शिवसेनेत आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, गोपाल दातकर, अ‍ॅड. अनिल काळे, ज्योत्स्ना चोरे, मुकेश मुरमकार असे अनेक दावेदार आहेत.

‘वंचित’मध्ये वाढले दावेदार

अकोला पूर्व या मतदारसंघाच्या निर्मितीपूर्वी हा मतदारसंघ बोरगाव मंजू या नावाने होता. त्यावेळी १९९९, २००४ मध्ये व अकोला पूर्वच्या निर्मितीनंतर २००९ मध्ये अशा तिन्ही निवडणुकांमध्ये भारिप-बमसंने विजय मिळवून या मतदारसंघाला ‘गड’ निर्माण केला होता. २०१४ मध्ये अवघ्या २ हजारावर मतांनी हा गड पडला, त्यामुळे येथील जनाधार लक्षात घेता भारिप-बमसंचे नवे स्वरूप असलेल्या वंचित आघाडीकडे उमेदवारीसाठी दावेदार वाढले आहेत. माजी.आ. हरिदास भदे, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी मंत्री डॉ.डी.एम.भांडे, बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे अशी मोठी स्पर्धा आहे. 

काँग्रेस, राष्टÑवादीत इच्छुकांना वेध आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. २०१४ मध्ये येथे राष्टÑवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले होते. यावेळी काँग्रेसला अवघी ५.६६ तर राष्टÑवादीला ३.६१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेससमोर आता भाजपासह वंचितचे आव्हान आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, अजाबराव ताले, पुरुषोत्तम दातकर आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर तांत्रिक कारणांमुळे लोकसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. अभय पाटील हेसुद्धा या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार होऊ शकतात, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्टÑवादी काँग्रेसही या मतदारसंघात चाचपणी करत असून, हा मतदारसंघ मिळालाच तर राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह शिरीश धोत्रे, श्रीकांत पिसे यांची नावे चर्चेत आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी