शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
6
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
7
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
8
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
9
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
10
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
11
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
12
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
13
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
14
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
15
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
16
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
17
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
18
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
19
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
20
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विजेची तूट कायम

By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST

देशातील वाढलेल्या वीज मागणीचा राज्याला फटका बसला असून नागरिकांना सोसावे लागते आकस्मिक भारनियमन

अकोला: गत तीन दिवसांपासून नागरिकांना आकस्मिक भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या वीज मागणीमुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त विजेचा पुरवठा झाला नाही. देशभर विजेची मागणी वाढली असल्याने त्याचा फटका राज्याला बसला आहे. राज्यातील बहुतांश फिडर भारनियमनमुक्त झालेले आहेत. वीज गळतीनुसार पाडण्यात आलेल्या गटातील अ, ब, क आणि ड गट पूर्णपणे भारनियमनमुक्त आहेत. असे असले तरी तीन दिवसांपासून आकस्मिक भारनियमन केले जात आहे. विजेची वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेली वीज यात मोठी तफावत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रीडमधूनही आवश्यक विजेचा पुरवठा महाराष्ट्राला झाला नाही. त्यामुळे आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. ही तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळय़ा स्रोतांकडून २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली. केंद्राच्या ग्रीडमधून १२00 मेगावॅट वीज बुधवारी मिळाली. अदानीचा ६६0 मेगावॅट आणि जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच पूर्ववत सुरू झाल्याने विजेची तूट काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतरही क आणि ड या भारनियमनमुक्त असलेल्या गटांतील फिडरवरही १ तासाचे भारनियमन करावे लागले. अकोला शहरातील फिडरवरही भारनियमन याच कारणामुळे झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारसाठी ८00 ते १000 मेगावॅट वीज उपलब्ध करून घेण्यात आली असल्याने राज्यातील विजेची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.