शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने परराज्यातील पाच लाखांवर मजुरांना पोहोचवीले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:26 IST

४४ हजार १०६ बसद्वारे या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले.

- सचिन राऊत

अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकलेल्या तसेच त्यांच्या राज्यात आणि गावात जाण्यासाठी पायपीट करीत असलेल्या राज्यातील तब्बल पाच लाख ३७ हजार ५९३ मजुरांना त्यांच्या राज्यात तसेच त्यांच्या गावांच्या सीमेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम या काळात राज्य परिवहन महामंडळाने केले. ४४ हजार १०६ बसद्वारे या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले.कोरोनाचा तीव्र संसर्ग सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी पायपीट सुरू केली होती. हजारो किलोमीटर पायी प्रवास सुरू असतानाच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, जालना, अमरावती, अकोला यांसह विविध जिल्ह्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतण्यासाठी कुटुंबीय तसेच चिमुकल्यांसह पायी प्रवास करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते; मात्र याच असह्य वेदना राज्य परिवहन महामंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तब्बल ९० हजार चालक-वाहकांना एकत्रित करून त्यांच्याद्वारे तब्बल ४४ हजार १०६ बसफेऱ्यांद्वारे विविध राज्यातील स्थलांतरीत मजुरांना एसटीद्वारे त्यांच्या राज्याच्या तसेच गावाच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. त्यामुळे या स्थलांतरीत मजुरांनी त्यांच्या राज्यातील सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारने अडचणीच्या काळात दिलेल्या साथीमुळेच पुन्हा राज्यात कामासाठी परतने सुरू केले आहे. ४४ हजार बसफेऱ्यांद्वारे तब्बल पाच लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही एसटीने हे मोठे कार्य करून स्थलांतरित मजुरांना मोठा आधार दिला. या आठ राज्यातील अधिक मजूरमहाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओडिसा या आठ राज्यातील स्थलांतरीत मजूर मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. कोरोनाच्या संकटानंतर या मजुरांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविल्यानंतर गावचा रस्ता धरला होता; मात्र वाहने नसल्याने पायीच जात असलेल्या या मजुरांना एसटीने त्यांच्या राज्यात सोडले. राजस्थानातून आणले राज्यात विद्यार्थीवैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी शिकवणी वर्गासाठी राजस्थान येथील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले आहेत. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हे विद्यार्थी कोटा येथेच अडक लेले असताना त्यांना एसटी महामंडळाच्या ७२ बसद्वारे राज्यात आणण्यात आले. कोटा येथून महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात तब्बल एक हजार ४०० विद्यार्थ्यांना आणण्यात आल्याची कामगिरी एसटी महामंडळाने केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी