शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

केंद्राची बंदी असतानाही मातीच्या वीटभट्ट्या सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:25 PM

महसूल आणि पर्यावरण विभागाकडून कारवाई होत नसल्याने वीटभट्ट्या बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळसा व लिग्नाइटवर चालणाऱ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन थांबवण्यासाठी मातीच्या विटांची निर्मिती बंद करण्याचा केंद्र शासनाचा आदेश असतानासंपूर्ण राज्यासह अमरावती विभागात सर्रासपणे वीटभट्ट्यांतून उत्पादन सुरू आहे. याप्रकरणी महसूल आणि पर्यावरण विभागाकडून कारवाई होत नसल्याने वीटभट्ट्या बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत.केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्त्खनन करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये मातीचे उत्खनन रोखण्यासाठी कोळसा किंवा लिग्नाइटवर आधारित औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी फ्लाय अ‍ॅश वापरण्याचे बंधन घातले होते. त्या अधिसूचनेमध्ये संशोधन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसात संबंधितांकडून आक्षेपही मागवण्यात आले. आक्षेपानंतर पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले; मात्र त्या अधिसूचनेची अनेक राज्यात अंमलबजावणी सुरूच झालेली नाही. त्यामुळे मातीपासून वीटभट्ट्या निर्मितीचा धंदा राजरोसपणे जोरात सुरू आहे. राज्यात सर्वत्रच ही परिस्थिती असताना अमरावती विभागातही तोच प्रकार घडत आहे.अमरावती विभागात पारस, नागपूर विभागात कोराडी, मौदा, चंद्रपूर येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. या सर्वच वीजनिर्मिती केंद्रांच्या ३०० किमी परिघात संपूर्ण विदर्भाचा विस्तार आहे. तरीही त्या केंद्रातून निघणाºया फ्लाय अ‍ॅशऐवजी मातीचे उत्खनन करून विटांची निर्मिती धडाक्यात सुरूच आहे. त्याकडे केंद्रीय पर्यावरण, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. तर माती उत्खननाला प्रतिबंध करणाºया महसूल विभागाकडूनही कारवाईला बगल दिली जात आहे. परिणामी, पर्यावरणासाठी घातक ठरणाºया वीटभट्ट्या सुरूच आहेत.

वीटभट्टीमालकांचा विरोधदरम्यान, केंद्र शासनाची ही अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील वीटभट्टीचालकांनी १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे धरणे आंदोलनही केले आहे.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेसंदर्भात महसूल आणि पर्यावरण विभागाने केलेल्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल, तसेच परिणामकारक अंमलबजावणीसाठी तातडीने निर्देश दिले जातील.- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण