शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १0 लाखांच्यावर तंट्यांचा लागला निकाल

By admin | Updated: November 15, 2014 23:52 IST

तंटामुक्त अभियानाला ग्रामस्थांचा प्रतिसाद.

डॉ. किरण वाघमारे/अकोलाराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला संपूर्ण राज्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विविध स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात गावांमधील तंटामुक्त समित्यांना यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्यांचे असून, महसुली तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. सामोपचाराने तंटे मिटल्यामुळे न्यायालयाचा भार कमी झाला आहे. गावांमधील तंटे गावातच निकाली निघावे, या उद्देशाने २00७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राज्य शासनाने सुरू केली. या उपक्रमाला गावागावांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळाला. गावांमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या. या समित्यांना न्यायालयाच्या धर्तीवर न्याय निवाडा करण्याचे अधिकार देण्यात आले. जवळपास १५0 गुन्ह्यांवर न्याय देण्याचा अधिकार समितीला प्राप्त झाला. फौजदारी स्वरूपातील गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्ह्यांवर न्यायनिवडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समित्यांना मिळाला. त्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची पाळीच अनेक गावकर्‍यांवर आली नाही. तंटामुक्त मोहिमेला ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभल्यामुळेच आतापर्यंंत वेगवेगळ्या स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक तंटे हे फौजदारी स्वरूपाचे आहेत. फौजदारी स्वरूपातील गुन्ह्यात न्यायनिवाडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसला, तरी फौजदारी गुन्हे होऊच नये, या दृष्टीने तंटामुक्त समितीने खबरदारी घेतली. समि तीने फौजदारी तंटे सामोपचाराने गावातल्या गावातच मिटविले आणि न्यायालयाचा वेळ वाचविला. यातून ग्रामस्थांचा पैसा आणि वेळदेखील वाचला. तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी २00७-0८ मध्ये २ लाख ५ हजार ११५ तंटे मिटविण्यात आले. पुढील वर्षी २00८-0९ मध्ये २ लाख १८ हजार ८१३ , २00९-१0 मध्ये २ लाख २५ हजार ३0२ तंटे व त्यानंतरच्या काळात १ लाखापेक्षा जास्त फौजदारी तंटे मिटविण्यात आले. याच कालावधीत दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटविण्यात आले. यात पहिल्या वर्षी २0६६३, दुसर्‍या वर्षी १0२२५, तिसर्‍या वर्षी १४६९९ तर चौथ्या वर्षी १६८५७ तंटे मिटविण्यात आले. महसुली स्वरूपाचे ३३ हजार ३९९ तंटे मिटविण्यात समि त्यांना यश आले.