शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनखर्च हजारात वाढतोय; मात्र हमीभाव ४० रुपयांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ ...

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ होत आहे. अशातच केंद्र शासनाने रब्बी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. त्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. उत्पादनखर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीदरात मात्र ४० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

सध्या पेट्रोल, डिझेल दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र, शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात अत्यल्प वाढ होत आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला ४० रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला २०१५ रुपये असा भाव मिळणार आहे, तर हरभऱ्याला ५२३० रुपये म्हणजे यात केवळ १३० रुपयांची वाढ केली आहे. केवळ ४०,१३० रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शेतीतज्ज्ञ म्हणतात...

सरकारने हमीदराचे आमिष दाखविणे बंद करणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना कधीही त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकत नाही. कारण, कोणतीही दराची हमी ही कमीत कमी असते. ती उत्पादनखर्चसुद्धा भरून काढू शकत नाही. सरकारने किमान आधारभूत किमतीची पद्धत ही रद्द करावी.

- ललित बहाळे

दरवर्षी मजुरी, खते, बी-बियाणे यांच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. त्या तुलनेत ही वाढ तोडकी आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढते, त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाववाढ होणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रकाश मानकर

सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, आकड्यांचा खेळ केला आहे. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी वाढले आणि हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. शेतकऱ्यांना न्याय न देण्याची सरकारची भूमिका आहे.

- प्रशांत गावंडे

शेतकरी म्हणतात...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे; परंतु दरवर्षी मजुरी १० टक्के, बियाणे व खते यांचे तर ३०-३५ टक्के वाढतात. त्या तुलनेत हमीदरात अत्यल्प वाढ होत आहे.

- बाळासाहेब रामचवरे, शेतकरी, रुस्तमाबाद

सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.

- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ४०, तर कुठे १३० रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये कीटकनाशके व खतेही वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.

- गणेश काळे, शेतकरी, तामशी