शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 3:24 PM

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला. पावसाचे अडीच महिने संपत आले असताना धरणात अल्प जलसाठा असल्याने आता वऱ्हाडातील जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात ४०.८७ जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४३.२२ टक्के जलसाठा झाला आहे. उमा ३२.०२, मोर्णा धरणात २२.४१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ५४.९६ टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ८.८७, तर उतावळी धरणातील पातळी १७.२३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात ९.७७ टक्के, पेनटाकळी धरणात ४.८७ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.५० टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १६.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६१.२८ टक्के, एकबुर्जी धरणात १०० टक्के, तर सोनल धरणात ४४.०३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४५.६० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९८.९३, अरुणावती ३४.४१, तर बेंबळा धरणात ४३.६६ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरणbuldhanaबुलडाणा