शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरीच करतील बीजोत्पादन!

By admin | Updated: November 16, 2014 01:09 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे धडे.

अकोला: शेतकर्‍यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळावे, याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत विदर्भातील शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञानाची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे. बोगस बियाण्यांना आळा बसावा, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. अलीकडे देशात बियाणे टंचाई आणि बोगस बियाण्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकर्‍यांना प्रत्येक हंगामात सोसावा लागतो. यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड बियाणे टंचाई निर्माण झाली होती. प्रमाणित सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने विदर्भातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे वांझ निघाले, या वांझ बियाण्याची नुकसान भरपाई शेकडो शेतकर्‍यांना अद्या पही मिळाली नाही. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. मुख्यत्वे विदर्भातील शेतकर्‍यांच्या माथी बोगस, वांझ बियाणे मारले जात असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांनी उच्च प्रतिचे बियाणे निर्माण करावे, यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत शंभरच्यावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, येत्या हंगामात या शेतकर्‍यांकडून उच्च प्रतिचे बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे अनेक वाण विकसित केले आहेत. यात काबुली काक-२, तूर आशा, गहू, उडीद, गुलाबी, करडी अशा शेकडो वाणांचा समावेश आहे; तथापि जोपर्यंत हे वाण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंंत त्या वाणांचे तंत्रज्ञान आणि उपयोगिता निश्‍चित होऊ शकणार नाही. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाचे बियाणे वापरावे आणि या बियाण्यांचे बीजोत्पादन करण्यावर भर देण्यात येत आहे. बीजोत्पादन तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज असून, बीजोत्पादन कर ताना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सोडविल्या जात आहेत. शेतकर्‍यांनी याबाबतच्या तांत्रिक बाबी समजून घेण्याची गरज असल्याचे कृषीविद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ.डी.टी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.