शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 3:42 PM

हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे.

- संतोष गव्हाळेहातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे. ई - क्लास जमिनीवर साकारत असलेल्या या गावतलावाचे काम सुरू करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत आहे. १४ एकरात जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साह्याने खंडाळा ते मांजरी नाल्याच्या बाजूने गावतलावाचे खोदकाम सुरू होते. या मुरुमाची मोठ्या ट्रकने वाहतूक सुरू होती. मात्र अचानक या तलावाच्या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले. १४ एकरातील गावतलावचे काम ठप्प पडल्याने या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवणार नाही. निमकर्दा आणि टाकळी निमकर्दा गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निमकर्दा ते मोरगाव सादीजन मार्गावर १४ एकराच्या गावतलावासाठी प्रयत्न केले. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाच्या आजूबाजूच्या भिंतीचे काम अर्धवट असून तलावाचे खोलीकरण १० फूट पर्यंत झाले आहे. या तलावाचे खोलीकरण १५ फूटपर्यंत पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाल्यास या तलावात पाणीसाठा राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या तलावाच्या कामाची बाळापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली होती. मे महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर उपाययोजना करण्यासाठी गावतलावाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

बंद पडलेल्या कामाला मुहूर्त सापडेना!

अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुरुमाचे खोदकाम बंद करण्यात आले. अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरणा साठी निमकर्दा ऐवजी दुसऱ्या गावातून मुरुम नेण्यात येत असल्याने निमकर्दा गावतलावचे काम ठप्प पडले आहे.

दृष्काळ सदृष्य परिस्थितीत निमकर्दा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास लोकसहभाग मिळणार आहे.      -  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर. 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई