शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नेरधामणा बॅरेज अडकले लालफितशाहीत;  कंत्राटदाराला सहा वर्ष विनादंड मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:50 IST

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली.

ठळक मुद्दे२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली. कंत्राटदारामुळे कामास विलंब झाल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना दंड आकारू न मुदत वाढ देणे क्रमप्राप्त होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे मात्र बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे.२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पण २०११ ते २०१४ पर्यत निधीच नसल्याने काम बंद होते. या ९ वर्षात पंप हाऊसचे डिझाईन झाले नाही, मुख्य जलवाहीनीचे कामही जमीन उपलब्ध नसल्याने झाले नाही. या शिवाय महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधीकरणाने स्थगिती दिल्याने पाटबंधारे विभागाने मंजुरी देण्याचे टाळले परिणामी या बॅरेजच्या कामाची गती खुंटली. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.आताही हे काम संथगतीने सुरू असून,डीझाईनच नसल्याने संथगतीने होत असलेले पंप हाऊसचे काम पंधरा दिवसात बंद पडणार असल्याचे संकेत आहेत. शेतकºयांच्या शेतात सिंचनासाठी पाणी पुरविण्यासाठीच्या वितरण व्यवस्थेच्या कामाची तर अद्याप सुरू वातच झाली नाही.अद्याप या कामासाठीच्या निविदाच काढल्या नाहीत.या वितरण व्यवस्थेच्या भूमीगत जलवाहिनींचे कामही १०० ते १५० कोटींचे आहे.जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यानी २०१५ पासून आतापर्यंत वारंवार या बॅरेजला भेट दऊन पाहणी केलेली असून, प्रलंबीत कामे त्वरीत निकाली काढण्यासाठीच्या निरीक्षण टिपणी सुध्दा येथील पाटबंधारे मंडळ व विभागाला दिलेल्या आहेत.पंरतु याबाबत आतापर्यत या विभागाने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली. या मागचे कारण काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.आणखी हे काम करणाºया कंत्राटदारास दंड आकारलेला नाही हे विशेष. 

कंत्राटदराने काम बंद ठेवल्याने त्यास दंड आकारण्याची सुचना अकोला पाटबंधारे मंडळ अधिक्षक अभियंत्याला केलेली आहे.बॅरेजचे काम पुर्ण व्हावे,यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.- संजय घाणेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा, अमरावती.

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज