शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण :  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:27 PM

अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

- नितीन गव्हाळे

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. या जिल्ह्यातील अनुक्रमे अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ स्थान पटकावून आपली गुणवत्ता दाखवून दिली, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणाºया विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये उत्कृष्ट निकाल देत राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा जिल्ह्याने तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे स्थान बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले. इयत्ता पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबाद जिल्ह्याने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे स्थान गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणातील पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीसिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गातील सर्वेक्षणात एकूण ८२.१७ टक्के प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने ८१.४५ टक्के, सातारा जिल्ह्याने ८0.३२, टक्के, तर नगर जिल्ह्याचा निकाल ७७.३९ टक्के, बीड जिल्ह्याचा ७६,७४, सोलापूर जिल्ह्याचा ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला.

पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी अव्वलवर्ग पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने ६८.५१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६५.१३ टक्के, हिंगोली जिल्ह्याने ६३.६७, गडचिरोली जिल्ह्याने ६२.९१ टक्के मिळविले. बीड जिल्ह्याने ६0.६१ टक्के पटकावत पाचवे स्थान मिळविले.

आठवीच्या सर्वेक्षणात बीड प्रथमवर्ग आठवीचा निकाल कमी लागला असून, यात बीडने ५५.0४ टक्के मिळवित पहिले स्थान पटकावले. ४८.२४ टक्के मिळवून दुसरे स्थान सिंधुदुर्गने, तर नंदुरबार जिल्ह्याने ५0.६१ टक्के मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले.  बुलडाण्याने ४५.३५ टक्के मिळवित चौथे, तर हिंगोलीने ४६ टक्के मिळवित पाचवे आणि गडचिरोली जिल्ह्याने ४६.६२ टक्के प्राप्त करीत सहाव्या स्थानी झेप घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांची टक्केवारीगडचिरोली, बुलडाणा, वाशिमची कामगिरी समाधानकारक

गडचिरोली- ७१.१५ टक्के (वर्ग तिसरा)                ६२.९१ टक्के (वर्ग पाचवा)                ४६.६२  टक्के (वर्ग आठवा)वाशिम- ७१.८४  टक्के (वर्ग तिसरा)           ५९.७४ टक्के (वर्ग पाचवा)           ३८.0१ टक्के (वर्ग आठवा)अकोला-६२.८३ टक्के (वर्ग तिसरा)            ५५.४९ टक्के (वर्ग पाचवा)            ३६.५३ टक्के (वर्ग आठवा)नागपूर- ६७.६९ टक्के (वर्ग तिसरा)          ५0.८३ टक्के (वर्ग पाचवा)            ३४.४८ टक्के (वर्ग आठवा)अमरावती- ६0.२६ टक्के (वर्ग तिसरा)              ५0.४९ टक्के (वर्ग पाचवा)              ३६.९८ टक्के (वर्ग आठवा)यवतमाळ- ५६.८२ टक्के (वर्ग तिसरा)               ४५.८४ टक्के (वर्ग पाचवा)               ३३.८२ टक्के (वर्ग आठवा)बुलडाणा- ६८.४ टक्के (वर्ग तिसरा)           ५६.७४ टक्के (वर्ग पाचवा)            ४५.३५ टक्के (वर्ग आठवा)

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक