शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

एनएएस करणार जिल्हय़ातील १७३ वर्गांमधील विद्यार्थ्यांची चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:20 IST

अकोला : नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (एनएएस) अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवीच्या प्रत्येकी ६१ वर्गांचे आणि इयत्ता आठवीच्या ५१ वर्गांचे (राष्ट्रीय संपादणूक चाचणी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देएनसीईआरटीमार्फत चाचणी गुणवत्ता पाहून कृती आराखडा तयार होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (एनएएस) अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवीच्या प्रत्येकी ६१ वर्गांचे आणि इयत्ता आठवीच्या ५१ वर्गांचे (राष्ट्रीय संपादणूक चाचणी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  एनसीईआरटीने सर्वेक्षणासाठी शाळांची निवड केली आहे. या सर्वेक्षणांतर्गत निवडलेल्या शाळेतील वर्गामध्ये १३ नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेत ऑबजेक्टिव्ह, एमसीक्यू पर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्यात येतील. इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांना भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र या तीन विषयांवर आधारित ४५ प्रश्नांची चाचणी घेण्यात येईल. तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र, सामाजिकशास्त्र या चार विषयांवर  ६0 प्रश्न विचारण्यात येतील. चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम राहणार नसून, सर्व प्रश्न इयत्तेनुसार क्षमतांवर आधारित राहणार आहेत.  प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना चाचणीच्या एक दिवस अगोदर शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून प्राप्त होतील. निवडलेल्या वर्गातील ३0 विद्यार्थ्यांंसाठी ही चाचणी होईल. मात्र, वर्गाची पटसंख्या ३0 पेक्षा अधिक असेल, तरीही चाचणीला १00 टक्के उपस्थिती राहील. याची खबरदारी मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे. निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेने घेऊन चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यायचे आहेत. 

चाचणीसाठी राहतील भरारी पथकेएनएएसच्यावतीने घेण्यात येणार्‍या चाचणीसाठी जिल्हा स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकात  प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. चाचणीच्या दिवशी हे भरारी पथक जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देईल. 

चाचणीतून काय साध्य होईल?चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी राज्य स्तरावर ओएमआर पद्धतीने होणार असून, तालुकानिहाय निकाल एनएएसच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल. जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल. 

एनसीईआरटीमार्फत जिल्हय़ातील शाळांमधील इयत्ता तिसरी ते पाचवी आणि आठवीच्या निवडक वर्गांंची चाचणी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंची गुणवत्ता आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून ही चाचणी होणार आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारीप्राथमिक विभाग