शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारपासून होणार बाजारपेठ खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांनी २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला. त्यानुसार ...

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांनी २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू करण्यात येत आहेत. सुरुवातीला १ मार्चपर्यंत होती; मात्र आता ही मुदत ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी विविधस्तरांवरुन झाली. अखेर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनमध्ये प्रशासन व व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांमध्ये बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य अधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मत जाणून घेतले. दाेन दिवस किरणा दुकाने बंद ठेवणे, ऑड इव्हन सूत्रानुसार दुकाने सुरु ठेवणे आदींचा समावेश हाेता; मात्र हे दाेन्ही मुद्दे चर्चेदरम्यान फेटाळण्यात आले. अखेर व्यापाऱ्यांनी दुपारी ५ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली. तसेच शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्याची तयारी काही व्यापाऱ्यांनी दर्शविली. यावर जिल्हाधिकारी सकारात्मक हाेते. आता याबाबत लवकरच अंतिम निर्णय गुरुवारी जारी हाेण्याची शक्यता आहे. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे प्रभारी आयुक्त जावळे, उपविभागीय दंडाधिकारी डाॅ, नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम उपस्थित हाेते.

कोविड चाचणीसह नियमांचे पालन करणे बंधनकारक

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना काेविड चाचणीसह नियमांचे पालन करणे आवश्यकच राहणार असल्याचे स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी कोविडची चाचणी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर काही दिवसांसाठी सीलची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दुकानामध्ये गर्दी हाेणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी व्यापाऱ्यावर राहील. व्यापारी,कर्मचारी व ग्राहकांना दुकानात विना मास्क येता येणार नाही. हाॅटेलमधून केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे.

कोरोना चाचणीचे आवाहन

सर्व व्यापाऱ्यांना कुटुंबासह त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करूनच व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाने सत्कारात्मक दर्शविली अाहे. त्यामुळे सर्व व्यावसाियकांनी स्वतःसह प्रतिष्ठानात काम करणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.