शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 7:25 PM

Akola News : आंब्यांचे दर आटोक्यात असले तरी बाजार बंद असल्याने विक्री मंदावली आहे.

अकोला : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे; परंतु या निर्बंधांचा फटका आंब्यालाही बसला आहे. यावर्षी आंब्यांचे दर आटोक्यात असले तरी बाजार बंद असल्याने विक्री मंदावली आहे. त्यामुळे फळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मे पर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसोबत फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झालेला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याच्या दरांवर झाला. हापूस सोबत केशर, लालबाग, दशेरी आंब्याचे दर घटले आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रति डझन ठोकमध्ये आहे; मात्र विक्री मंदावल्याने अधिकांश आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो, केशर ६०, लालबाग ३० रुपये आणि दसेरी आंब्यालाही ५० ते ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने १५ मे नंतर निर्बंध हटविल्यास, त्यापुढे आंबा विक्रीच्या व्यवसायाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान

९ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात अकोला शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला; मात्र ९ मे रात्रीपासून कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे फळविक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागीच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. हापूस आंब्याची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी घरपोच डिलीव्हरीची सोय उपलब्ध केलेली आहे. विशेषत: रत्नागीरीच्या हापूस आंब्याला अधिक मागणी आहे.

 

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. कोरोनामुळे बेभाव आंबा विकावा लागत आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास यावरही मात करता येते. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

- डॉ.विजय म्हैसने, आंबा उत्पादक

 

टॅग्स :AkolaअकोलाMangoआंबा