शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांच्या कौलासाठी तीन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:09 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नरत आहेत.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीचेच चित्र पुन्हा उभे ठाकले असल्याने मतविभाजनावरच निवडणुकीचा निकाल फिरणार असल्याचे स्पष्ट आहे. गेल्यावेळी काँग्रेसने खेळलेली खेळी यावेळी कायम आहे तसेच २०१४ ची मोदी लाट आता नाही आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवा पॅर्टन घेऊन रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी शहरे वगळता सर्वच शहरांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला होता. त्यामुळे यावेळी शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे या मतांसाठी काँग्रेस व वंचितमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अकोल्यासह आठ शहरे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख ९० हजार ८६० मतदारांची नोंद होती. त्यापैकी ३ लाख २६ हजार ५१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६०७ मते संजय धोत्रे यांना तर १ लाख २० हजार ४७४ मते हिदायत पटेल यांना मिळाली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना केवळ ३७ हजार ७७४ मतांवर समाधान मानावे लागले. या पृष्ठभूमीवर यावेळी शहरांचा मागोवा घेतला असता भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरस कामगिरी करून आपला मतदार टिकवून ठेवल्याचे दिसते. अकोला महापालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मतदारांचा प्रातिनिधिक आढावा घेतला तर भाजपाने पालिकेत एकहाती सत्ता आणली आहे. दुसरीकडे गेल्या वेळी १८ नगरसेवकांची काँग्रेस ११ वर आणि ७ नगरसेवकांची भारिप-बमसं अवघ्या ३ नगरसेवकांवर थांबली आहे. त्यामुळे शहरी मतदारांची पसंती मिळविण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा ही आंबेडकर व पटेल यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट असून, भाजपाला आपली मतपेढी टिकविण्याचे आव्हान आहे.बाळापूर, पातूर, बार्शीटाकळीत काँग्रेस अव्वलमुस्लीमबहुल असलेल्या बाळापूर शहरात काँग्रेसने भाजपापेक्षा तिप्पट मते घेतली होती, तर पातूर व बार्शीटाकळीमध्येही काँग्रेस अव्वल होती. या तीनही शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था यावेळीही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या मतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘हात’ मारण्याचे लक्ष्य आहे.अकोला पश्चिम तिन्ही उमेदवारांचे ‘लक्ष्य’अकोला शहरातील पश्चिम परिसर हा भाजपाचा गड असला तरी काँग्रेसनेही येथे तोडीस तोड मते घेऊन आपली ताकद अधोरेखित केली होती. विशेष म्हणजे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना शहरातून मिळालेल्या मतांमध्ये सर्वाधिक मते अकोला पश्चिममध्येच होती. त्यामुळे अकोला पश्चिम हा तीनही उमेदवारांसाठी ‘लक्ष्य’ ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा