शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

शेततळ्यामुळे वाढली विहिरीची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:22 AM

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने चिंता वाढली आहे, तसेच सिंचनामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. दुसरीकडे, कृषी ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने चिंता वाढली आहे, तसेच सिंचनामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. दुसरीकडे, कृषी विभागाकडून जलसंधारणच्या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तालुक्यातील भांबेरी येथे एका शेतकऱ्याने शेततळ्याचा लाभ घेतला. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेततळ्यामध्ये मुबलक पाणी असून, विहिरीच्या पातळीतही वाढ झाली आहे. दुसरीकडे, तालुक्यातील भूजल पातळी दिवेंसदिवस खालावत असल्याने जलसंधारण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

तालुक्यातील भूजलपातळी २३ मीटरपर्यंत खोल गेल्याने सिंचन क्षेत्रात घट होत आहे. कृषी विभागाचे माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भांबेरी येथील शेतकरी वर्षा नागाेराव इंगळे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी खोल गेल्याने त्यांना सिंचनासाठी अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी पोक्रा योजनेंर्तगत सन-२०१९ मध्ये शेततळ्याचा लाभ घेऊन शेततळे खोदले. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेततळ्यात सद्यस्थितीत मुबलक पाणी आहे. शेततळ्यामुळे विहिरीची पातळीही वाढल्याचे इंगळे यांनी सांगितले. शेततळ्याच्या नियोजनाबाबत तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व कृषी पर्यवेक्षक पी.जी. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या रब्बी हंगामात हरभरा पिकला पाणी देणे सुरू आहे. दुसरीकडे, तालुक्यातील भूजल पातळी दिवेंसदिवस खालावत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी केले आहे.

तालुक्याची भूजल पातळी चिंताजनक

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत भूजल पातळी खोल गेली आहे. २०१८च्या तुलनेत २०२०मध्ये २ मीटरने वाढ झाली आहे. २०२० मध्ये भूजल पातळी ही २०.९३ मीटर खाली आहे.