शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:47 AM

अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. 

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. शिवपूर कासोद या भागात धुरर्डी नदीवर धरण बांधण्यात येत आहे. लघुपाटबंधारे बांधकाम विभागांतर्गत १५.६१ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला २७ फेब्रुवारी २00४ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामाचा कार्यारंभ आदेश ५ डिसेंबर २00५ रोजी बियाणी नामक कंत्राटदारास देण्यात आला. सदर प्रकल्प हा सन २00८ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी होता; परंतु १३ वर्षे उलटूनही अद्यापही  हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला नाही. धरण प्रकल्पाची किंमत वाढत गेली; मात्र भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना २00५ पासून अडकवून ठेवण्यात आले. जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी कामाचे आदेश दिल्या गेले. शेतकर्‍यांना मात्र २0 ऑगस्ट २00८ मध्ये निवाडा देत मोबदला देण्यात आला. त्यामुळे धरणाची किंमत वाढली असताना २00५ पासून जमिनीची किंमत का वाढवली नाही, अल्प मोबदला का देण्यात आला, निवाडा होण्यापूर्वी धरण कामाचा आदेश कसा काय देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत भूसंपादन प्रक्रिया-निवाडा तसेच धरण प्रकल्पाची वाढलेली किंमत पाहता संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेमध्ये गौडबंगाल झाल्याची शक्यता शेतमालकाचे शेतमजूर झालेल्या रामदास राऊत यांच्यासह प्रकल्पगस्त शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

जमिनी देणारे शेतकरी झाले शेतमजूर! धरण मातीचे असलेल्या या धरणाची लांबी २२८७ मीटर, तर उंची १८.६१ मीटर आहे. या धरणात ३.४४ दलघमी जलसाठा होणार असून, ३८0 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या धरणाकरिता परिसरातील १२८.९५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ २५१ हेक्टरकरिता प्रकल्प उभारून शेतकर्‍यांना शेतमालकाचे शेतमजूर करण्यात आले आहे. शिवपूरचे रामदास राऊत यांच्या कुटुंबाची साडेदहा एकर शेती संपादित करण्यात आली. त्या मोबदल्यात त्यांना ५ लाख ३0 हजार रुपये देण्यात आले होते. शेतकर्‍याचा शेतमूजर झालेल्या राऊत कुटुंबीयांना सरकारी नोकरी देऊन वाढीव मोबदला मिळणार, ई-क्लासची जमीन मिळणार, अशी विविध आश्‍वासने त्यावेळी देण्यात आली; परंतु त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. अशातच भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने मृत्यूला कवटाळणार्‍या धर्मा पाटील यांच्यासारखी व्यथा शिवपूरच्या रामदास राऊत यांच्यासह इतर शेतकर्‍यांची झाली आहे.

प्रकल्प रखडल्याने कंत्राटदार बदलला! या धरणाचे काम बियाणी नामक कंत्राटदाराला देण्यात आले होते; परंतु २२ टक्के बिलात काम घेतले. कंत्राटदाराने मातीचे कारण पुढे करीत प्रकल्पाचे काम बंद ठेवल्याने कंत्राटदाराला ८३ लाख रुपये दंड ठोठावला होता. अखेर कंत्राटदाराचे काम बंद करून पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २0१५  पासून स्वत: अर्धवट स्थितीत असलेल्या या प्रकल्पाचे काम हाती घेतले असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली.ं

टॅग्स :DamधरणAkola Ruralअकोला ग्रामीण