शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 10:54 IST

आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.

अकोला : आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.‘आदर्श सिंचन व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थांचा सहभाग व सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता एकनाथराव जोगदंड होते. या सत्रात दादाराव देशमुख, मनोज तायडे, अविनाश डुडूळ, विश्वंभर घोसीकर यांनी सहभाग घेत विचार मांडले. अपेक्षित लोकसहभाग मिळाला नसल्याने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण कागदावरच राहिले असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभाग आणि पाणी वापर संस्थांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा असून, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, असे मत अविनाश डुडूळ यांनी व्यक्त केले. वातावरणातील बदल आणि परतीच्या पावसाने भरणारी धरणे यामुळे ओलिताचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील कशा, असा प्रश्न मनोज तायडे यांनी उपस्थित केला.शेतकरी संकटात असल्याच्या परिस्थितीत पाणी व्यवस्थापनात शेतकऱ्यांच्या सहभागाची अपेक्षा करणे अयोग्य असून, शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा होत असताना पाणी व्यवस्थापनाचा मात्र ताळमेळ लावण्यात येत नाही. त्यामुळे पाणी वितरण प्रणालीची कामे तातडीने होणे आवश्यक असून, देखभाल-दुरुस्तीवर लक्ष देऊन, पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचे मनोज तायडे यांनी सांगितले. प्रत्येक लाभार्थी शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. त्यासाठी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता विश्वंभर घोसीकर यांनी मांडले.पिकांना पाणी देण्यासाठी बंदनलिका पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून, शेतीतून उत्पन्न होणाºया शेतमालाचे मूल्यवर्धन करायचे आहे, असे दादाराव देशमुख यांनी सांगितले. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत; मात्र प्रकल्प उभारणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापनाची कामे पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील, अशी अपेक्षा एकनाथराव जोगदंड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ