शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
2
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
3
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
4
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
5
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
6
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
7
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
8
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
9
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
10
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
11
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
12
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
13
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
14
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
15
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
16
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
17
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
18
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
19
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 10:54 IST

आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.

अकोला : आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.‘आदर्श सिंचन व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थांचा सहभाग व सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता एकनाथराव जोगदंड होते. या सत्रात दादाराव देशमुख, मनोज तायडे, अविनाश डुडूळ, विश्वंभर घोसीकर यांनी सहभाग घेत विचार मांडले. अपेक्षित लोकसहभाग मिळाला नसल्याने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण कागदावरच राहिले असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभाग आणि पाणी वापर संस्थांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा असून, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, असे मत अविनाश डुडूळ यांनी व्यक्त केले. वातावरणातील बदल आणि परतीच्या पावसाने भरणारी धरणे यामुळे ओलिताचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील कशा, असा प्रश्न मनोज तायडे यांनी उपस्थित केला.शेतकरी संकटात असल्याच्या परिस्थितीत पाणी व्यवस्थापनात शेतकऱ्यांच्या सहभागाची अपेक्षा करणे अयोग्य असून, शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा होत असताना पाणी व्यवस्थापनाचा मात्र ताळमेळ लावण्यात येत नाही. त्यामुळे पाणी वितरण प्रणालीची कामे तातडीने होणे आवश्यक असून, देखभाल-दुरुस्तीवर लक्ष देऊन, पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचे मनोज तायडे यांनी सांगितले. प्रत्येक लाभार्थी शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. त्यासाठी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता विश्वंभर घोसीकर यांनी मांडले.पिकांना पाणी देण्यासाठी बंदनलिका पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून, शेतीतून उत्पन्न होणाºया शेतमालाचे मूल्यवर्धन करायचे आहे, असे दादाराव देशमुख यांनी सांगितले. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत; मात्र प्रकल्प उभारणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापनाची कामे पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील, अशी अपेक्षा एकनाथराव जोगदंड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ