शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ...

अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये मदतीची जिल्ह्यातील तहसील कार्यालस्तरावर वितरित करण्यात आली असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांतील ७२ हजार ४७५ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५१ कोटी ५७ लाख ४६ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतीची रक्कम डिसेंबरअखेरपर्यंत ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची मदतीची रक्कम गत ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील महसूल यंत्रणा व्यस्त असल्याने, दहा दिवसांपूर्वी वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक नुकसानाची मदत जमा करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात येणार आहे. पीक नुकसानाची मदत खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

-संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी