शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:41 PM

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात ३.६७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात ०.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १९.८२ तर अरुणावती धरणात १३.५२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने वऱ्हाडडावरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या १६ डिसेंबर रोजी हा जलसाठा ३९.७८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये ४९.९७ टक्के होता. यावर्षी ४ जानेवारीपर्यंत जलसाठ्यात मोठी घसरण झाली असून, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.०३ टक्के, निर्गुणा ५८.४१, उमा धरणात केवळ ३.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९०.१९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २८.४३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५०.०७, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १५.६१, पलढग ७८.०३, मन १६.४८ तोरणा २३.७० टक्के, तर उतावळी धरणात ३१.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १९.८२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.५२, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ७०.४८ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.

बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर!सध्या हिवाळा ऋतू असल्याने बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर एवढाच आहे. तरी जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तापमान वाढले तर बाष्पीभवन वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो, त्यामुळे आतापासून विशेषत: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणीDamधरण