शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:31 AM

सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- राहूल सोनोने

दिग्रस बु.: गुडघ््यापर्यंत चिखल, ठिकठिकाणी पाणी, त्यातून ३० ते ३५ किलो सोयाबीन गठ्ठे डोक्यावर घेऊन जात असलेले शेतकरी, असे चित्र दिग्रस बु. सह पातूर तालुक्यात दिसत आहे. सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पातूर तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे उभ्या पिकांना कोंब फुटले आहेत. शेतरस्त्यावर चिखल साचल्याने शेतकºयांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत आहे. एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल डोक्यावर वाहून शेतकरी घरी आणत आहे.पातूर तालुक्यातीन अनेक शेतकºयांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवले होते. या सोयाबीनला सततच्या पावसामुळे कोंब फुटले आहेत. पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शेती मशागतीची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी उसंत देताच दिग्रस बु. परिसरात शेतकºयांनी शेतात धाव घेतली. तालुक्यातील सर्वच शेतरस्त्यांवर चिखल साचल्याने बैलगाडी तर दूरच साधे चालताही येत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शेतकरी एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल घरी आणत आहेत. पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित ३० टक्के सोयाबीन घरी आणण्यासाठी चिखल तुडवावा लागत आहे.

खर्चही वाढलापावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तसेच दर्जाही घसरला आहे. अशा स्थितीत या सोयाबीनला चांगला भाव मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. शेतात पडून असलेला शेतमाल घरी आणणे शेतकºयांना शक्य नाही. त्यामुळे मजूर लावून हा माल घरी आणण्यात येत आहे. चिखल व पाण्यात जाण्यासाठी मजूर वेगळी मजुरी मागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. भावाची शाश्वती नसताना शेतकरी हा खर्च करीत असल्याने आणखी एक संकट शेतकºयांवर आले आहे. परिसरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी राहुल गावंडे, रामा गावंडे आदींनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संप