शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ई-नाम योजनेमुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:51 IST

बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नुकतीच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून ई - नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला. हे चर्चासत्र येथील बाजार समितीत पार पडले.शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणिकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार केले तर त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार पारदर्शक राहतील का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी उपस्थित केले. शेतकºयांच्या फायद्याची योजना असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. ई - नाम योजना लागू करायची असेल तर ती स्वतंत्र सुरू करावी त्या करीत बाजार समिती बरखास्त कशाला. हे तर असे झाले की, घरात खटमल झाले म्हणजे घरच जाळून टाकण्याचा प्रकार झाला असा आरोपही फाटे यांनी केला.व्यापारी संघटनेच्या वतीने विवेक मोहत यांनी सदर ई - नाम व्यापारामध्ये व्यापार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी व व्यापारी वगार्ला देने गरजेचे असून ती योजना शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या करिता फायद्याची की तोट्याची ह्याबाबत पूर्ण माहिती जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठलाच अंदाज कोणीही काढू शकत नाही. शेतमालामध्ये जो पर्यंत ग्रेडिंग होत नाही किंवा नमुना हातात घेऊन डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत शेतकºयांना योग्य भाव देता येत नाही. त्यामुळे आॅनलाईन खरेदीमध्ये फसगत होण्याचा धोका अधिक आहे, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती