शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

दिग्रस बु. येथे चोरीचा प्रयत्न फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:14 AM

दिग्रस बु. : चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथे गत आठवडाभरात चार ते पाच चोरीच्या घटना घडल्या ...

दिग्रस बु. : चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथे गत आठवडाभरात चार ते पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पुन्हा चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिग्रस बु. येथे दि. ७ जूनच्या मध्यरात्री धाडसी चोरी झाली होती. गावातील उत्तम गावंडे यांच्या घरात चोरी करीत दागिन्यासह रोख लंपास केली. सुभाष बराटे यांच्या घरातील रोख लंपास केली होती. बसस्थानक परिसरात असलेल्या अजित ताले यांची दुचाकी लंपास केली. चार दिवसापूर्वी गाय चारचाकी वाहनात कोंबून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, सोमवारी पुन्हा रात्रीच्या बकऱ्या चोरीचा प्रयत्न करीत असताना घरातील व्यक्तीला जाग आल्याने प्रयत्न फसला. या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. धनराज धोत्रे यांनी ठाणेदारांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली आहे.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

परिसरात महिन्यातील चोरीची पाचवी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.