शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची हत्या करणा-या दाम्पत्यास जन्मठेप!

By admin | Updated: May 12, 2017 08:38 IST

मृतक व आरोपी नातेवाईक; डोक्यात घातला लोखंडी सब्बल.

अकोला : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात युवकाच्या डोक्यात लोखंडी सब्बल घालून त्याची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाशिम बायपासवरील पंचशील नगरात राहणाऱ्या मंगला श्यामराव सिरसाट (५८) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा रवी सिरसाट (३०) याचे आरोपी वर्षा मोहन तायडे (पंचशील नगर) हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. वर्षा ही विवाहित आहे. रवी सिरसाट हासुद्धा विवाहित असून, त्याला दोन मुले आहे. पत्नीला रवीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने ती त्याला सोडून माहेरी निघून गेली. आरोपी वर्षा तायडे हिच्यासोबत रवीचे अनैतिक संबंध असल्याने, ती त्याला सातत्याने लग्न करण्यास तगादा लावत होती; परंतु मंगला सिरसाट यांचा विवाहास विरोध होता. वर्षासोबत लग्न केले तर रवीचा संसार मोडेल, अशी भीती होती. त्यामुळे वर्षा तायडे हिच्यासोबत या कारणावरून नेहमीच वाद होत. २९ मार्च २०१५ रोजी वर्षा तायडे ही रवी सिरसाट याच्या घरी आली. तिने तुझ्यासोबत काम आहे, असे सांगून रवी सिरसाटला तिच्या घरी नेले. या ठिकाणी वर्षा तायडेचा पती मोहन उत्तम तायडे याने रवीसोबत वाद घातला आणि त्याच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार केले. यावेळी वर्षा तायडे याने रवीचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला. कसाबसा उठून घराबाहेर आला आणि जागीच कोसळला. मंगला सिरसाट यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपी वर्षा मोहन तायडे आणि मोहन उत्तम तायडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ (३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. ठाणेदार रियाज शेख यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने तायडे दाम्पत्याला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली.