शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

 CoronaVirus :  राज्यात अकोल्यातील मृत्यूदर स्थिर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 2:40 PM

Coronavirus news अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असून परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी या सारख्या जिल्ह्यांचा मृत्यूदर काही प्रमाणात वाढला आहे.

अकोला: राज्यात मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूदरही नियंत्रणात आला होता. हा आलेख आता पुन्हा वाढताना दिसून येत आहे; मात्र यात अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असून परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी या सारख्या जिल्ह्यांचा मृत्यूदर काही प्रमाणात वाढला आहे. विदर्भात मात्र सर्वाधिक मृत्यूदर अकोला जिल्ह्यातच असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील मृत्यूचा आकडाही वाढत आहे. राज्याचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर आला आहे. मध्यंतरी ही स्थिती नियंत्रणात होती; मात्र आता काही जिल्ह्यांमधील मृत्यूदर पुन्हा वाढायला लागला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे राज्यात मुंबईतील मृत्यूदर ३.९ टक्के असून, हा राज्यात सर्वाधिक आहे. गत महिनाभरापूर्वी राज्यात मुंबई वगळता अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक होता. गत दीड महिन्यात ही स्थितीत काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात स्थानिक आरोग्य विभागाला यश मिळाले. याच दरम्यान राज्यातील कोल्हापूर, ३.५, परभणी ३.६, रत्नागिरी ३.७ तसेच सोलापूर ३.४ टक्के मृत्यूदर झाला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर अकोला जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. दुसरीकडे मात्र, विदर्भात अद्यापही कोरोनाच्या मृत्यूदरात अकोला जिल्हा पहिल्या स्थानी आहे. मृत्यूदराचा हा आकडा स्थिर असला, तरी दररोज मृत्यूचा वाढता आकडा चिंताजनक आहे.

नागपूरचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर

अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर ३.३ टक्के असून, हा आकडा विदर्भात सर्वाधिक आहे. तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर आहे. अमरावती जिल्ह्याचा मृत्यूदर २ टक्क्यांवर आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या