शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मतदार याद्यांमध्ये घोळ; ‘बीएलओं’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:34 IST

अद्ययावत मतदार याद्या तयार होणे अपेक्षित असताना ‘बीएलओं’च्या निष्क्रिय कारभारामुळे याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती आहे.

अकोला: मतदार जनजागृती अभियानद्वारे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, नावातील दुरुस्ती करण्यासह मयत मतदारांची नावे वगळणे आणि घराचा पत्ता बदलून दोनपैकी एकाच ठिकाणच्या मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुषंगाने अद्ययावत मतदार याद्या तयार होणे अपेक्षित असताना ‘बीएलओं’च्या निष्क्रिय कारभारामुळे याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मतदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अर्थात, देशभरातील हा उत्सव नियोजनबद्धदरीत्या व शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह उमेदवारांचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी, मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवली असता, नवमतदारांसह अनेकांनी मोहिमेत सहभाग नोंदवून नाव नोंदणीसह दुरुस्त्या सुचवल्या. मतदानासाठी मतदार सज्ज होत असतानाच वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत असल्याची माहिती आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी कायम असल्याने ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ््या यादीत विभागल्या गेल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्र बदलल्या जाणार आहे. अर्ज भरून देताना संबंधित रहिवासी सोसायटी, परिसराचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहून देतात. तरीही ऐन वेळेवर दुसऱ्याच यादीत नावाचा समावेश होतो कसा, असा प्रश्न सर्वसामान्य मतदार उपस्थित करू लागले आहेत.शिक्षकांनी घेतली मध्यस्थांची मदतयादीत मतदारांची नावे समाविष्ट करणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषदसह महापालिक ा शिक्षकांची मदत घेतली होती. शिक्षकांनी या कामासाठी त्या-त्या भागातील मध्यस्थांची मदत घेऊन यादीचे सोपस्कार पूर्ण केल्याची माहिती आहे. अर्थात या प्रकारामुळे बोगस मतदानाला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्लम एरियात संख्या वाढली!मतदार जनजागृती अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये प्रामुख्याने स्लम एरियात मतदारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. काही भागात बोगस मतदारांच्या नावाचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. असे प्रकार निवडणूक विभाग उजेडात आणणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

चुकीच्या पत्त्यांमुळे कुटुुंबे विभागलीमतदारांकडून अर्ज सादर करताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मतदार यादीत नावाचा समावेश होत असताना मतदारांचे पत्ते बदलल्या जात असल्याचे दिसून येते. या बाबतीत नेमकी चूक होते कोठे, असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण होत आहे. चुकीच्या पत्त्यांमुळे एकाच कुटुुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागल्या जात असल्याचे चित्र समोर येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक