शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मतदार याद्यांमध्ये घोळ; ‘बीएलओं’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:34 IST

अद्ययावत मतदार याद्या तयार होणे अपेक्षित असताना ‘बीएलओं’च्या निष्क्रिय कारभारामुळे याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती आहे.

अकोला: मतदार जनजागृती अभियानद्वारे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, नावातील दुरुस्ती करण्यासह मयत मतदारांची नावे वगळणे आणि घराचा पत्ता बदलून दोनपैकी एकाच ठिकाणच्या मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुषंगाने अद्ययावत मतदार याद्या तयार होणे अपेक्षित असताना ‘बीएलओं’च्या निष्क्रिय कारभारामुळे याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मतदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अर्थात, देशभरातील हा उत्सव नियोजनबद्धदरीत्या व शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह उमेदवारांचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी, मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवली असता, नवमतदारांसह अनेकांनी मोहिमेत सहभाग नोंदवून नाव नोंदणीसह दुरुस्त्या सुचवल्या. मतदानासाठी मतदार सज्ज होत असतानाच वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत असल्याची माहिती आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी कायम असल्याने ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ््या यादीत विभागल्या गेल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्र बदलल्या जाणार आहे. अर्ज भरून देताना संबंधित रहिवासी सोसायटी, परिसराचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहून देतात. तरीही ऐन वेळेवर दुसऱ्याच यादीत नावाचा समावेश होतो कसा, असा प्रश्न सर्वसामान्य मतदार उपस्थित करू लागले आहेत.शिक्षकांनी घेतली मध्यस्थांची मदतयादीत मतदारांची नावे समाविष्ट करणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषदसह महापालिक ा शिक्षकांची मदत घेतली होती. शिक्षकांनी या कामासाठी त्या-त्या भागातील मध्यस्थांची मदत घेऊन यादीचे सोपस्कार पूर्ण केल्याची माहिती आहे. अर्थात या प्रकारामुळे बोगस मतदानाला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्लम एरियात संख्या वाढली!मतदार जनजागृती अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये प्रामुख्याने स्लम एरियात मतदारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. काही भागात बोगस मतदारांच्या नावाचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. असे प्रकार निवडणूक विभाग उजेडात आणणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

चुकीच्या पत्त्यांमुळे कुटुुंबे विभागलीमतदारांकडून अर्ज सादर करताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मतदार यादीत नावाचा समावेश होत असताना मतदारांचे पत्ते बदलल्या जात असल्याचे दिसून येते. या बाबतीत नेमकी चूक होते कोठे, असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण होत आहे. चुकीच्या पत्त्यांमुळे एकाच कुटुुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागल्या जात असल्याचे चित्र समोर येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक