शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सच्या थकीत रकमेची वसुली न केल्यास वेतनवाढ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

मनपा प्रशासनाने मालमत्तांचे दर तीन वर्षांनी पुनर्मूल्यांकन करून कराच्या करमेत वाढ करणे अपेक्षित आहे. तसे न करता १९९८ पासून ...

मनपा प्रशासनाने मालमत्तांचे दर तीन वर्षांनी पुनर्मूल्यांकन करून कराच्या करमेत वाढ करणे अपेक्षित आहे. तसे न करता १९९८ पासून मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाला पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आले. तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीपासून ते २०१४ पर्यंत मालमत्ता कराचा ऑफलाइन पद्धतीने भरणा हाेत असल्याने या परिस्थितीचा फायदा उचलत अनेक अधिकाऱ्यांनी खिसे जड केले. परिणामी उत्पन्नात वाढ न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या कायम हाेती. दरम्यान, प्रशासनाने २०१७ मध्ये मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत पहिल्यांदा रीतसर करवाढ केली. यापासून मनपाला ७२ काेटींचे उत्पन्न प्राप्त हाेईल, असा दावा प्रशासनाने केला हाेता. परंतु नागरिकांनी कर जमा करण्यास आखडता हात घेतल्याने थकबाकीचा आकडा १०० काेटींच्या पार गेला. ही रक्कम वसूल न केल्यास वेतनाची समस्या निर्माण हाेईल, असे दिसताच प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी टॅक्स विभागातील वसुली निरीक्षकांना महिन्याकाठी किमान २०० पावत्या फाडून कर वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता न केल्यास वेतनवाढ राेखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उद्दिष्टपूर्तीसाठी वसुली निरीक्षक सरसावले

प्रभारी आयुक्त अराेरा यांनी टॅक्स विभागाला जुलै महिन्यात २१ काेटींचा थकीत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले हाेते. यापैकी निम्मे उद्दिष्ट पूर्ण झाले. अकाेलेकरांना शास्ती अभय याेजनेसाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली हाेती. उद्दिष्टपूर्तीसाठी सुटीच्या दिवशीही वसुली निरीक्षक कर जमा करण्यासाठी सरसावल्याचे दिसून आले.

अकाेलेकर करवाढीच्या ओझ्याखाली !

प्रशासनाने २०१७ मध्ये सुधारित करवाढीचा प्रस्ताव सभागृहात सादर केला हाेता. त्या वेळी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी दर कमी करण्याची एकमुखी मागणी केली हाेती. ही मागणी सत्ताधारी भाजपने फेटाळून लावली. परिणामी काेराेनाच्या काळात सर्वसामान्य अकाेलेकर करवाढीच्या ओझ्याखाली दबले. यात प्रशासनाच्या कारवायांमुळे भर पडली आहे.