शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

निधी अभावी स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला ‘ब्रेक’

By admin | Updated: February 14, 2015 01:32 IST

राज्यातील १५६ उमेदवार वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत.

मनोज भिवगडे/अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २0१३ साली घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील १५६ उत्तीर्ण उमेदवार सर्व सोपस्कार पार पाडूनही वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी तीन विभागासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उतीर्ण उमेदवारांना सर्वाजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातर्फे नियुक्ती देण्यात आली असताना, पाणी पुरवठा व स्वच्छा विभागातर्फे निधीचे कारण पुढे करीत उमेदवारांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २0१३ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २0१३ रोजी राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या चार केंद्रावर घेण्यात आली होती. यात साहाय्यक अभियंत्याचे (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ८0 , जलसंपदा विभागासाठी ७५९ आणि पाणीपुरवठा विभागासाठी १५८ पदांचा समावेश होता. मुख्य परीक्षा आटोपल्यानंतर २९ मार्च २0१४ रोजी लोकसेवा आयोगातर्फे निकाल घोषित करण्यात आला. गुणवत्ता यादीनुसार प्रत्येक विभागासाठी आवश्यक पदांएवढय़ा उतीर्ण उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने उमेदवारांना नियुक्ती दिली. त्यानंतर जलसंपदा विभागातील उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न विधानसभेत गाजला. अखेर या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही विभागातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असली तरी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मात्र निधी अभावी १५६ उमेदवारांना वर्ष उलटले तरी नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे.*मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविलेस्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वर्षभरापासून नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. लोकसेवा आयोगाने सर्व सोपस्कार उरकून पाणीपुरवठा विभागाकडे १५६ उमेदवारांची शिफारस केली. त्यामुळे आता पुढचे सोपस्कार या विभागाला पूर्ण करावयाचे होते. या विभागाकडे निवड झालेल्या उमेदवारांनी विचारणा केली असा त्यांना असामाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या कार्यालयाचे उंबरठे उमेदवारांनी झिजविले. ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. *प्रधान सचिवांना दिले चौकशीचे आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे उतीर्ण उमेदवारांनी त्यांची कैफियत मांडली. आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातूनही उतीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांची तक्रार शासनाकडे पाठविली; परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. याबाबत मंत्र्यांकडे विचारणा केली असता उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कुठे अडचणी आल्यात याबाबत चौकशी करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.