शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनचे लाभार्थी संभ्रमात

By admin | Updated: June 15, 2014 22:23 IST

अन्न सुरक्षा योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजला आहे.

आगर: देशातील मध्यमवर्गीय व्यक्ती पोटभर आहार घेऊ शकला पाहिजे या हेतूने शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजला आहे. योजनेनुसार स्वस्त धान्य दुकानातून ३, २, व १ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, गहू व कडधान्य मिळण्याची तरतूद करण्यात आली; पण या योजनेचा फायदा कुणाला मिळाला, असा प्रश्न निर्माण झाला असून, ही योजना फोल असल्याचे दिसून येत आहे.

सद्य:स्थितीत स्वस्त धान्य वितरण प्रणाली आजारी असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात ही योजना सुरू होऊन अनेक ग्रामीण भागामध्ये या योजनेचा फायदा गरजू लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासाठी जबाबदार स्वस्त धान्य दुकानदार, सरपंच, तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक असल्याचे दिसत आहे. अकोला तालुक्यातील मलकापूर, बार्शिटाकळी, बाळापूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये लाभार्थ्यांची नावे या योजनेत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कोणताच लाभार्थी धान्यापासून वंचित राहायला नको असे शासकीय धोरण असताना मात्र जिल्ह्यातील काही गावांत ही योजना रोडावली आहे. अनेक लाभार्थ्यांचे विधवा, बीपीएल, अपंग, भूमिहीन, शेतमजूर इंदिरा आवास यादीत नाव आहे. तरीही त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अकोला तालुक्यातील मलकापूर ग्रामपंचायतने याबाबत पुढाकार घेऊन नव्याने नावे समाविष्ट करण्याचा ठराव घेतल्याने काही लाभार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कित्येक लाभार्थ्यांनी सन २0१२ मध्ये रेशन कार्ड तयार केले. बीपीएल, शेतमजूर, गवळी व मजुरी करणारे असून, त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले नाही. बीपीएल यादीतून २0१३ मध्ये अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. त्यांचेही नाव अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही. यात नोकरीवर असणारे, श्रीमंत व ओलिताची शेती करणारे शेतकरी, व्यवसाय करणारे, टाटा सुमोधारक, ट्रॅक्टरधारक, पक्क्या घरात राहणारे, सरपंच, राजकारणी, धान्य दुकानदाराजवळील प्रेमींची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अपात्र लोकांना यामध्ये स्थान मिळाल्याने खरे गरजू यापासून वंचित राहिले. पुरवठा अधिकार्‍यांची या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व श्रीमंतांची नावे या यादीतून नष्ट करू न गरजूंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.