शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बेघरांच्या जागेसाठी निधी देण्यास ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:34 IST

अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही.

अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही. शासनाकडून निधीच मिळाला नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदासीन आहे, ही बाब आता शासनाच्या घोषणेचा फोलपणा मांडणारी आहे.जातीनिहाय सर्वेक्षणातील प्रपत्र ‘ब’मध्ये शासनाने घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी तयार आहे. त्यामध्ये जिल्ह्यात ६८ हजारांपेक्षाही अधिक लाभार्थी आहेत. घरकुलासाठी घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणे हजारो लाभार्थींना अशक्य आहे. अनेकांना मालकीची जागा नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. त्या लाभार्थींना दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेतून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना शासनाने २०१५-१६ पासूनच सुरू केली. गेल्या तीन वर्षात किती लाभार्थींना हा लाभ देण्यात आला, याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडेही नव्हती. सोबतच शासनाने जागा खरेदीसाठी किती निधी दिला, याबाबतही माहिती देण्यास कुणीच तयार नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने जुलै २०१८ मध्येही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेने गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल मागविला. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत जागेसाठी अनुदान देण्याचा एकही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून सादर केला नसल्याचे पुढे आले. त्यावर ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी सातही गटविकास अधिकाºयांना ४ आॅक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या नोटीसचाही काहीच परिणाम झालेला नाही.- सर्वांना घराची घोषणा ठरतेय फोलपणाचीरमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. जिल्ह्यातील हजारो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये राहतात, त्यांनाही मालकीच्या जागेचा पुरावा मिळत नसल्याने वंचित ठेवले जात आहे. जागा खरेदीचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जात नसल्याने जिल्ह्यातील लाभार्थींना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्याचा करंटेपणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केला आहे.- मूर्तिजापुरातील दहाही प्रस्ताव फेटाळलेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मूर्तिजापूर पंचायत समितीने १० प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये त्रुटी असल्याने ते सर्वच परत पाठवण्यात आले. प्रस्ताव सादर करताना गटविकास अधिकारी स्तरावर खबरदारी घेतली जात नाही. ग्रामीण विकास यंत्रणा प्रस्ताव फेटाळते, या प्रकाराने बेघर लाभार्थींची शासनाने थट्टा सुरू केल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना