शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

बेघरांच्या जागेसाठी निधी देण्यास ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:34 IST

अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही.

अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही. शासनाकडून निधीच मिळाला नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदासीन आहे, ही बाब आता शासनाच्या घोषणेचा फोलपणा मांडणारी आहे.जातीनिहाय सर्वेक्षणातील प्रपत्र ‘ब’मध्ये शासनाने घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी तयार आहे. त्यामध्ये जिल्ह्यात ६८ हजारांपेक्षाही अधिक लाभार्थी आहेत. घरकुलासाठी घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणे हजारो लाभार्थींना अशक्य आहे. अनेकांना मालकीची जागा नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. त्या लाभार्थींना दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेतून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना शासनाने २०१५-१६ पासूनच सुरू केली. गेल्या तीन वर्षात किती लाभार्थींना हा लाभ देण्यात आला, याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडेही नव्हती. सोबतच शासनाने जागा खरेदीसाठी किती निधी दिला, याबाबतही माहिती देण्यास कुणीच तयार नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने जुलै २०१८ मध्येही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेने गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल मागविला. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत जागेसाठी अनुदान देण्याचा एकही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून सादर केला नसल्याचे पुढे आले. त्यावर ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी सातही गटविकास अधिकाºयांना ४ आॅक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या नोटीसचाही काहीच परिणाम झालेला नाही.- सर्वांना घराची घोषणा ठरतेय फोलपणाचीरमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी गावात स्वमालकीची जागा असल्याशिवाय तो मिळतच नाही. जिल्ह्यातील हजारो लाभार्थी शासकीय जागेत राहतात. पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेतील घरकुलांमध्ये राहतात, त्यांनाही मालकीच्या जागेचा पुरावा मिळत नसल्याने वंचित ठेवले जात आहे. जागा खरेदीचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जात नसल्याने जिल्ह्यातील लाभार्थींना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्याचा करंटेपणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी केला आहे.- मूर्तिजापुरातील दहाही प्रस्ताव फेटाळलेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मूर्तिजापूर पंचायत समितीने १० प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये त्रुटी असल्याने ते सर्वच परत पाठवण्यात आले. प्रस्ताव सादर करताना गटविकास अधिकारी स्तरावर खबरदारी घेतली जात नाही. ग्रामीण विकास यंत्रणा प्रस्ताव फेटाळते, या प्रकाराने बेघर लाभार्थींची शासनाने थट्टा सुरू केल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना